HW News Marathi
क्रीडा

भारतीय संघाने धोनीला वगळले

पुणे । पहिल्या टी-२० वर्ल्ड कपवर भारताचे नाव कोरणाऱ्या आणि सर्वश्रेष्ठ ‘फिनिशर’च्या यादीत जाऊन बसलेल्या महेंद्रसिंग धोनीची टी-२० कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर आल्याची चिन्हे दिसत आहेत. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात धोनीला वगळले आहे. धोनीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अशातच, निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के प्रसाद यांनी, नव्या किपरचा शोध सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महेंद्रसिंग धोनी मैदानावर चाचपडताना-झगडताना दिसतोय. एशिया कपमध्ये धोनीला चार डावांत फक्त ७७ धावा करता आल्या होत्या. या वर्षातील दहा डावांमध्ये त्याची सरासरी अवघी २८.१२ इतकी आहे. धोनीने आता थांबावे, अशी माहिती सूत्रांच्या साहाय्याने कळत आहे. दुसरीकडे, धोनी पर्वाची सांगता होणार की काय, अशी चर्चा ही सुरू झाली आहे. २०१९ च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने ही अदलाबदल केली जात आहे. कुणाला लॉटरी लागते, हे पाहणे महत्तवाचे ठरत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली,प्रथम फलंदाजीचा निर्णय

News Desk

कॅप्टन कुलचा हा व्हिडिओ पाहिलात का ?

News Desk

आंतरराष्ट्रीय धावपटू परविंदर चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk
देश / विदेश

जलप्रलयातही देशप्रेम अबाधित!

News Desk

गुवाहाटी : दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काल झालेले स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार कार्यक्रम आपण पाहिले. मात्र आसाममधील लहानशा शाळेसारखा सोहळा काल कुठेही झाला नसेल. पूरपरिस्थितीने वेढलेल्या आसाममध्ये चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन केले. जलप्रलयातही अबाधित राहिलेले हे देशप्रेम सध्या सोशल मिडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

आसाममधील ढुबरी जिल्ह्यात फकीरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नसकारा सरकारी शाळेतील हे छायाचित्र असून येथील सहायक शिक्षक मिजानूर रहमान यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर टाकल्यानंतर काही तासांतच ते तब्बल ६० हजार जणांनी शेअर केले. सोशल मिडियावर मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल रहमान यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने आसामसारख्या दुर्गम भागातील समस्यांना वाचा फुटल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘आम्हाला पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. वीजेची समस्याही मोठी आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आणि चार्ज करायला वीजही नव्हती. रस्ते आणि दळणवळणाच्या अन्य सुविधाही येथे आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत. याकडे शासनाने लक्ष पुरवावे,’ असे रहमान यांनी म्हटले आहे.

Related posts

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

News Desk

२०१९मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू, डब्ल्यूपीसीआयचा रिपोर्ट

News Desk

कुलभूषण जाधव यांना वकिल देण्यास लाहोरच्या बार कौन्सिलचा नकार

News Desk