HW News Marathi
क्रीडा

भारतीय संघाने धोनीला वगळले

पुणे । पहिल्या टी-२० वर्ल्ड कपवर भारताचे नाव कोरणाऱ्या आणि सर्वश्रेष्ठ ‘फिनिशर’च्या यादीत जाऊन बसलेल्या महेंद्रसिंग धोनीची टी-२० कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर आल्याची चिन्हे दिसत आहेत. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात धोनीला वगळले आहे. धोनीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अशातच, निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के प्रसाद यांनी, नव्या किपरचा शोध सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महेंद्रसिंग धोनी मैदानावर चाचपडताना-झगडताना दिसतोय. एशिया कपमध्ये धोनीला चार डावांत फक्त ७७ धावा करता आल्या होत्या. या वर्षातील दहा डावांमध्ये त्याची सरासरी अवघी २८.१२ इतकी आहे. धोनीने आता थांबावे, अशी माहिती सूत्रांच्या साहाय्याने कळत आहे. दुसरीकडे, धोनी पर्वाची सांगता होणार की काय, अशी चर्चा ही सुरू झाली आहे. २०१९ च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने ही अदलाबदल केली जात आहे. कुणाला लॉटरी लागते, हे पाहणे महत्तवाचे ठरत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सायन्स काॅलेज नांदेड येथे २५ एप्रिल पासून उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर 

News Desk

#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक कायम

News Desk

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

News Desk
देश / विदेश

वागुरा नौगाम सेक्टरमध्ये ग्रेनेड हल्ला, सीआयएसएफचा अधिकारी शहीद

swarit

श्रीनगर | काश्मीरमधील वागुरा नौगाम सेक्टरमध्ये शुक्रवारी (२६ ऑक्टोबर) रात्री दहशतवाद्यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) अधिकारी शहीद झाला आहे. भारत सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

सीआयएसएफ एएसआय राजेश कुमार यांना वागुरा नौगाम सेक्टरमध्ये पॉवर ग्रीडच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात राजेश कुमार शहीद झाले आहेत. तसेच परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्या शुक्रवारी (२६ ऑक्टोबर)ला झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून एक जवान शहीद झाला आहे. भारतीय लष्कराकडून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या मोहिमे अंतर्गत गुरुवारी (२५ ऑक्टोबर)ला ६ दहशतवाद्यांना खात्मा करण्यात मोठे यश आले आहे.

Related posts

कोफी अन्नान यांचे निधन

News Desk

कर्नाटकात सरकार स्थापन करण्यास आम्ही तयार !

News Desk

उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला..

Arati More