HW News Marathi
क्रीडा

नुसती विधाने करण्यापेक्षा तुमच्या कामावर जास्त लक्ष द्या !

नवी दिल्ली | “नुसती विधाने करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर जास्त लक्ष द्या”, असे बीसीसीआयमधील प्रशसकीय समितीने भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सुनावले आहे. “भारतीय क्रिकेट संघ गेल्या पंधरा वर्षांमधील सर्वोत्तम संघ असेल”, असे इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी शास्त्री यांनी म्हटले होते. शास्त्री यांच्या या विधानावर सुनील गावस्कर आणि सौरव गांगुली यांनी सडकून टीका केली होती.

दरम्यान, भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यात मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवानंतर संघाच्या माजी कर्णधारांकडून रवी शास्त्रींवर टीका मोठी टीका झाली. आता खुद्द बीसीसीआयनेच रवी शास्त्री यांना सुनावले आहे. “आता ऑस्ट्रेलिया दौरा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी कशी चांगली होईल. याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे,” असेही बीसीसीआयने रवी शास्त्री यांना उद्देशून म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. रवींद्रकुमार सिंघल ठरले ‘आयर्नमॅन २०१८’

Gauri Tilekar

ई-स्पोर्ट्स स्पर्धेत मुंबईची सिग्निफाय पुढच्या फेरीत  

News Desk

सर्वोच्च कामगिरी केलेल्या क्रीडापटूंना राष्‍ट्रपतींच्या हस्‍ते पुरस्कार प्रदान

Gauri Tilekar