HW News Marathi
क्रीडा

Asia Cup 2018 | विराट ऐवजी रोहित शर्मा करणार नेतृत्त्व

मुंबई | आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेतून कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार असल्याचे वृत्त आहे. तर उपकर्णधार पदाची जबाबदारी शिखर धवनकडे असणार आहे. वेगवान गोलंदाज खलील अहमद या संघातील नवा चेहरा आहे. १५ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होईल. १८ सप्टेंबरला भारताचा स्पर्धेतील पहिला सामना होईल.

विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल. तर शिखर धवन उपकर्णधार असेल. भारतीय फलंदाजीची जबाबदारी या दोघांसह के. एल. राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांच्यावर असेल. भारतीय गोलंदाजीची धुरा फिरकीपटू कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद यांच्या खांद्यावर असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सायना नेहवाल-पी.कश्यप अडकले विवाहबंधनात

News Desk

जलतरणपटूंना भावी उपक्रमांसाठी राज्य शासन सहकार्य करणार! – क्रीडामंत्री सुनील केदार

News Desk

भारतीय संघाने धोनीला वगळले

News Desk
देश / विदेश

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियांने ग्राहकांच्या खिशातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे केवळ देवाण-घेवाणपोटी वसूल करण्यात आलेल्या दंडातून मिळाले, हे विशेष. तुमच्या खात्यात तीन हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. तसेच इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे आकारले जातात. मेट्रो शहरात दीडशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही पैसे काढा किंवा काढू नका, तुम्हाला भूर्दंड भरावाच लागणार हे नवे बँकींक धोरण असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकके शासन बँक व्यवहार करण्यास प्रोत्सहन देत असून दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा धंदी सुरू आहे. एकट्या एसबीआय बँकेने ग्राहकांकडून दंडापोटी साडेतीनशे कोटी वसूल केले आहेत. इतर खासगी बँकांची ही रक्कमो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related posts

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! – जयंत पाटील

News Desk

भारताची शांततेच्या मुद्यांवरून पहिल्यांदा तालिबानसोबत चर्चा

News Desk

रियायन्स जिओमध्ये आणखी एका अमेरिकी कंपनीची गुंतवणूक

News Desk