HW News Marathi
क्रीडा

India vs Pakistan | भारताचे हे शिलेदार करणार पाकिस्तानचा सामना

मुंबई | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अवघ्या काही वेळात सुरू होईल. आशिया चषक स्पर्धेच्या या लढतीत दोन्ही संघ विजयासाठी आतुर आहेत. या सामन्यातील विजय हा कोणत्याही संघाला पुढील वाटचालीसाठी प्रचंड आत्मविश्वास देणारा ठरणार आहे.

त्यामुळे दोन्ही संघ लढतीत सर्वोत्तम खेळाडूंची फळी घेऊन मैदानावर उतरणार आहेत. पाकिस्तानचा संघ समतोल आहे, पण भारतीय संघाला अद्याप योग्य घडी बसवता आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा कोणत्या अकरा शिलेदारांना घेऊन मैदानात उतरेल याची उत्सुकता आहे.

हे आहेत अंतिम अकरा खेळाडू

रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, केदार जाधव/दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमरा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, बीसीसीआयने विराटला सुनावले

swarit

लंच आधी शतक करणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज

News Desk

संजय बर्वे  मुंबई पोलीस आयुक्त तर सुबोध जयस्वाल पोलीस महासंचालक पदी नियुक्त

News Desk
देश / विदेश

तीन तलाक विधेयकाला केंद्र सरकारची मंजुरी

News Desk

मुंबई | केंद्रसरकारने तीन तलाकच्या अध्यादेशास मंजुरी दिली आहे. आता या अध्यादेशाला कायद्याचे रुप देण्यासाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येणार आहे. हा अध्यादेश केवळ आणि केवळ सहा महिन्यांपर्यंत मर्यादीत असणार आहे. सहा महिन्यांनंतर सरकारला विधेयक पास करण्यासाठी विधेयक संसदेत सादर करावे लागेल. सरकारने तीन तलाक विधेयक लोकसभेत पास करुन घेतले आहे. पण राज्यसभेची संमती न मिळाल्याने गेल्या दोन सत्रांमध्ये हे विधेयक पास होऊ शकलेले नाही.

तीन तलाकच्या अध्यादेश मंजुरीनंतर काँग्रेसने प्रतिसाद दिला आहे. नरेंद्र मोदी सरकार मुस्लिम महिलांना न्याय देऊ इच्छित नाही, असे मत कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मांडले आहे. मोदी या विषयाचे राजकारण करुन मुसलमान महिलांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी सरकारवर केला आहे. महिलांना न्याय मिळावा ही कॉंग्रेस पार्टीची इच्छा आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

केंद्र सरकारने या विधेयकात सुधारणा केल्या आहेत. परंतु ही दुरुस्ती गेल्या सत्रात राजकीय मतभेद असल्यामुळे पुन्हा एकदा विधेयक फेटाळण्यात आले होते. त्यानंतर मोदी सरकारच्या कॅबिनेटने अध्यादेश मंजूर केला आहे. भारतीय जनता पक्ष तीन तलाक विधेयकावर नेहमीच आक्रमक राहिला आहे. भाजपने नेहमीच कॉंग्रेसवर सरकारवर विधेयक फेटाळण्याचा आरोप केला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी अनेकदा काँग्रेस पक्षावर तोंडसुख घेतले आहे.

Related posts

कार ब्लास्टमध्ये रामरहीमचा हात

News Desk

2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात लोकलुभावण्या घोषणांचा मारा

News Desk

कॅन्सरसारख्या असाध्य रोगालाही प्रदूषणाच्या बळींनी मागे टाकले !

News Desk