HW News Marathi
क्रीडा

विदर्भ संघाने दुसऱ्यांदा रणजी करंडकावर नाव कोरले

नागपूर | गतवर्षीच्या विजेता विदर्भ संघाने यंदा ही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रवर ७८ धावांनी मात करत विजय मिळाविला आहे. विदर्भाने दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकून नवीन इतिहास रचला आहे. विदर्भ संघाने विरोधी संघ सौराष्ट्रला २०६ धावांचे लक्ष ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्राची संपूर्ण संघ १२७ धावांवर विदर्भ संघाने त्यांना तंबूत पाठविले.

विदर्भ संघाच्या आदित्य सरवटेने सर्वाधिक ६ विकेट्स घेऊन विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. आदित्याबरोबरच अक्षय वाखरेने तीन विकेट घेऊन विजयासाठी संघाला हातभार लावला आहे. तर सौराष्ट्र आणि भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या हाती अपयश आले आहे. डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्रसिंग जडेजा याने ९६ धावात सहा गडी बाद करीत सौराष्ट्रची स्थिती भक्कम केली होती. परंतु संघाला ८ बाद १४८ असा संघर्ष करीत असताना आठव्या स्थानावर आलेल्या सरवटेने १३३ चेंडूत चिवट ४९ धावा करीत संघाला २०० चा आकडा गाठून दिला.

मंगळवार (५ फेब्रुवारी) २ बाद ५५ वरुन पुढे खेळणाऱ्या विदर्भाकडून मोहित काळे याने ९४ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर सौराष्ट्रच्या दुसऱ्या डावाला सरवटे यानेच खिंडार पाडले. पहिल्या डावातील शतकवीर स्नेल पटेल (१२), हार्विक देसाई (८) आणि पुजारा (०) यांना पहिल्या पाच षटकात त्याने तंबूत परत पाठविले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च कामगिरी केलेल्या क्रीडापटूंना राष्‍ट्रपतींच्या हस्‍ते पुरस्कार प्रदान

Gauri Tilekar

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराला सुरुवात

News Desk

सचिन तेंडुलकरने केली धोनीची पाठराखण

swarit