HW News Marathi
Uncategorized

अर्ध्या महाराष्ट्रात पावसाची दडी, खरिप वाया जाण्याची भीती

मुंबई- राज्य सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तर आस्मानी संकट मात्र काही केल्या शेतकऱ्यांचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. खरिप हंगाम सुरू होऊन दीड महिना पूर्ण झाला. मात्र, पावसाने दडी मारलेल्या उगवलेली कोवळी कोंब माना टाकण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांना सतावत आहे.

मुंबई, कोकण, नाशिक जिल्हा वगळत राज्यातील उर्वरित भागात पावसाचे प्रमाण नगण्य आहे. पहिल्या पावसात पेरण्या केल्यानंतर काही प्रमाणात पिके उगली परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली ती आजपर्यंत. पुढील काही दिवस पाऊस लांबल्यास पुन्हा एकदा शेतकरी नागावला जाण्याची भीती आहे.

राज्यात 80 ट्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यातील पन्नास टक्के पेरण्या सध्या संकटात आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, आदी जिल्ह्यात पेरण्या वाया गेल्या आहेत. अहमदनगर, पुणे जिल्हाचा काही भाग, सातारा, सोलापूरमध्ये पावसाची स्थिती समाधानकारक नाही.

हवामान खात्याच्या भरवशावर विसंबन राहून शेतकरी आपले आखाडे आखतो. परंतु ते आता फोल ठरताना दिसत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget 2019 : सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसह घर खरेदीमध्ये दिली ऐवढी सूट

News Desk

मुंबईमधील वाडिया रुग्णालयातील बंद ऑपरेशन थिएटरमध्ये लागली आग

Aprna

नवाब मलिकांच्या जावयाशी संबंधित दोघांना समन्स, एनसीबी SIT टीम करणार चौकशी

News Desk