HW News Marathi
Uncategorized

रेल्वेतील अन्न खरंच खाण्यायोग नाही

मुगलसराई( उत्तरप्रदेश) रेल्वेमधील अन्न मानवासाठी योग्य नसल्याचा अहवाल नुकताच सादर झालेला आहे. त्याचा प्रत्यय नुकताच उत्तरप्रदेशातील प्रवाशांना आला. झारखंडहून प्रवास करणाऱ्या काही भाविकांच्या व्हेज बिर्याणीमध्ये चक्क मृत पाल आढळून आली आहे. याबाबत प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ते अन्न फेकून आपले हात झटकले. परंतु काही वेळात प्रवाशी बेशुद्ध पडू लागल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. काही प्रवाशांनी तर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना तक्रार करून जेवणाचे फोटो पाठवून दिली. याची तत्काळ दखल घेऊन रेल्वे थांबली त्या ठिकाणी अधिकारी आणि डॉक्टरांचे पथक पाठवले. जखमी तत्काळ मदत केली. परंतु या निमित्ताने रेल्वेच्या जेवणाचा दर्जा कसा आहे, याचा अनुभव प्रवाशांना आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर राज्य सरकार सीबीआयला कागदपत्रे देण्यास तयार!

News Desk

मराठा क्रांती जनजागृती मोटरसाइकल रॅली

News Desk

तिरंदाजीत भारताच्या पदरी निराशा, अतानू दास पराभूत

News Desk