HW News Marathi
Uncategorized

अंगारकी निमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

मुंबई | अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईतील प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली आहे. सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सिध्दिविनायकासाठी फुलांची खास आरास करण्यात आली आहे. रात्री पुजा झाल्यानंतर सकाळी साडेसातपर्यंत जवळपास दोन लाख भाविकांनी येथे दर्शन घेतल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिराचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी दिली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था करण्यात आल्याचे संजीव पाटील यांनी सांगितले.

सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाची वेळ –

सोमवारी मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.१५ वाजेपर्यंत

मंगळवारी पहाटे ३.५० ते रात्री ८ वाजेपर्यंत

रात्री ९.५० ते रात्री १२ वाजेपर्यंत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘मेट्रो’ ३ च्या संचालक अश्विनी भिडेंना राज्याच्या प्रधान सचिवपदी पदोन्नती

News Desk

सावत्र आई – पित्याने पाडला मुलाचा मुडदा

News Desk

मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ सुरू 

News Desk
राजकारण

राजीव गांधींनी जे केले नाही ते भाजपने करुन दाखविले

News Desk

नवी दिल्ली | भाजप सरकारने आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरून (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदीनी) सुरू करण्यात आले आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या यादीत जवळपास ४० लाख नागरिकांची नावे नाहीत. या घटननंतर तीव्र पडसाद संसदेत उमटलेले आज पहायला मिळाले.

काँग्रेसने आसाम करार लागू केले, परंतु राजीव गांधींनी हा करार अंमलात आणण्याची हिंमत मात्र केली नाही. परंतु भाजप सरकारने हे करून दाखविले. असे अमित शहा यांनी राज्यसभेतील भाषणा दरम्यान असे विधान केले. शहांच्या या विधानानंतर गोंधळ केला. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचे मूळ काय, हे रजिस्टर कुठून आले, हे कोणीही सांगत नाही, असे अमित शहा राज्यसभेत म्हणाले.

१४ ऑगस्ट १९८५ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आसाम करार लागू केला. हा करार आसाममध्ये अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना सिटिजन रजिस्टरमधून वगळून एक नॅशनल रजिस्टर तयार केले होते. अशी नोंद या करारा होती.

Related posts

मनसेला सोडून गेलेल्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार फैसला

News Desk

‘त्या’ वक्तव्यासाठी साध्वी प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही !

News Desk

भारतात इतकी ताकद आहे की आपण शब्‍दकोशातील शब्‍दांचे अर्थ देखील बदलले !

News Desk