HW News Marathi
Uncategorized

देश वाचविण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागेल !

नवी दिल्ली | देश वाचविण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागेल, असे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वतीने रामलीला मैदानात भारत बचाव रॅलीला उपस्थित राहिलेल्यांना केले. सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, “जेव्हा मी शेतकरी बांधवांची अवस्था पाहते तेव्हा मला खूप त्रास होतो. त्यांना आपल्या शेतात योग्य वेळी बियाणे मिळत नाहीत, त्यांना सहज खत मिळत नाही. पाणी आणि वीज उपलब्ध नाही.”

सोनिया गांधी भाषणादरम्यान म्हणाल्या की, “मोदी-शाह सरकारने संविधानाचा अपमान केला आहे. त्यांना देश चालवण्यासाठी संसद आणि संविधानाची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. देशात अंधेर नगरी चौपट राजा अशी स्थिती आहे. आज देशातला तरुण बेरोजगार आहे. नोकरी मिळवण्यासाठी तो भटकतोय. गेल्या दशकांमध्ये अशी परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती. परंतु आता खूपच वाईट परिस्थिती आहे.”

अंधेर नगरी चौपट राजा असे देशात वातावरण

तसेच आज महिलांवर होणारे गुन्हेचे प्रमाण वाढले आहे. अंधेर नगरी चौपट राजा असे वातावरण देशात आहे. सबका साथ सबका विकास कुठे आहे असा प्रश्न प्रत्येकजण करतोय. रोजगार कुठे गेला? अर्थव्यवस्था का नष्ट झाली? तुम्ही मला सांगा की काळा पैसा आणण्यासाठी आणलेल्या नोटाबंदीमुळे काळा पैसा का बाहेर पडला नाही, याची चौकशी झाली पाहिजे. ते काळा पैसा कोणाकडे आहे? जीएसटीनंतरही मोदी सरकारची तिजोरी रिकामी का झाली? देशासाठी फायदेशीर असलेल्या कंपन्या कशा विकल्या जात आहेत आणि कोणाकडे? बँकांमध्येही सार्वजनिक पैसे सुरक्षित नाहीत असे अनेक प्रश्न सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना विचारले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५००च्या जवळ, चिंता वाढली

News Desk

कोणतीही पुर्वकल्पना न देता केंद्राने हटवली शरद पवारांची सुरक्षा

swarit

लाइव्ह करणाऱ्या कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, पोलिसांनी त्वरित घेतली अॅक्शन

Manasi Devkar