HW News Marathi
देश / विदेश

तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका, इथे तडजोड नाहीत !

मुंबई | “माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही,” असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. राहुल गांधींनी आज (१४ डिसेंबर) केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेने नाराजीचा सुर आवळला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे” या वक्तव्यावर आक्षेप घेत, ट्वीट करत म्हटले की, “विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा.इथे तडजोड नाहीत. जय हिंद”, असे ते म्हणाले.

तसेच संजय राऊत यांनी अजून एक ट्वीट करत म्हटले की, “आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. जय हिंद.” काँग्रेसने आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसने आज मोदी सरकारविरोधात रामलीला मैदानात ‘भारत बचाव रॅली’ आयोजन करण्यात आले आहे.

राहुल गांधी नेमके काय बोले

राहुल गांधी आज भारत बचाव रॅलीच्या भाषणा दरम्यान भाजपवर टीका केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे”, असे त्यांनी म्हटले. राहुल गांधी पुढे म्हटले की, मी सत्यासाठी कधीच माफी मागणार नाही, मी मरेन पण माफी मागणार नाही. मात्र, मीच काय, पण काँग्रेसमधील कोणीही माफी मागणार नाही.” “जर कोणाला माफी मागायची आहे. तर नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदीबरोबर त्यांचे असिस्टंट अमित शहा यांनी देशाची माफी मागायला हवी. या देशाची शक्ती, अर्थव्यवस्था संपूर्ण जग पाहायचा. मात्र आज देशात काय होत आहे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला,” मोदी सरकारला केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील स्वच्छतेच्या कामासाठी मी कायम तुमच्यासोबत !

News Desk

उत्तर भारतात पुन्हा वादळाचा फटका, ४१ जणांचा बळी

News Desk

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

Aprna