HW News Marathi
Uncategorized

हिंदूंना अल्पसंख्यांक घोषीत करा !

भाजपची सर्वोच्च न्यायालयात मागणी

नवी दिल्ली – हिंदूंनाही अल्पसंख्यांक घोषीत करा अशी मागणी भाजपने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या मागणीने तुम्ही चक्रावला असाल ना ? पण हो अशी मागणी करणारी याची सर्वोच्च न्यायालयात भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी केली आहे. त्यांनी आपल्या याचिकेत

आठ राज्यात हिंदूंची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे या राज्यात हिंदूंना अल्पसंख्यांक घोषित करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या राज्यातील हिंदूंना अल्पसंख्यांकांना मिळणारे अधिकारही देण्यात यावेत अशी मागणीही भाजपनं याचिकेत केली आहे. लक्षद्वीप, नागालँड, जम्मू-काश्मीर, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि पंजाब या राज्यात हिंदू अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे या राज्यातील हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून उपाध्याय यांनी केली आहे. या राज्यात हिंदू हे अल्पसंख्यांक आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा या राज्यातील हिंदूंना मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे. २३ ऑक्टोबर १९९३ मध्ये केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून मुस्लिमांसहीत अन्य काही समुदायांच्या लोकांना अल्पसंख्यांकांचा दर्जा दिला होता. हा अध्यादेश असंविधानिक असल्याचं घोषित करा अशीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार या आठही राज्यात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. परंतू त्यांना या राज्यात अजून अल्पसंख्यांक घोषित करण्यात आलेलं नाही. याकडंही याचिकेत लक्ष वेधण्यात आलय. कोणत्याही समुदायाला अल्पसंख्यांकांचा दर्जा देताना तो त्याच्या लोकसंख्येच्या आधारेच दिला पाहिजे, असा युक्तिवादही याचिकेत करण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शाहिद कपूर घर सोडून हॉटेलमध्ये राहतोय

News Desk

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने केलेलं ट्विट भाजप नेत्याला पडले महागात

News Desk

आता येणार दोनशे रूपयांच्या नोटा

News Desk
मुंबई

भारतीय लष्करावर पादचारी पुल बांधण्याची वेळ !

News Desk

– मुंबईतल्या तीन रेल्वे स्थानकांत उभारणार पादचारी पुल

मुंबई – एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. म्हणून त्यांनी तीन स्थानकांवर तीन नवे पूल तातडीने उभारण्याचा निर्णय़ घेतला आहे. विशेष म्हणजे हे पुल बांधण्याचे काम आपल्या पराक्रमाने जगामध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय लष्कराला देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. याचा अर्थ पूल बांधण्यासाठी रेल्वे प्रशासन नक्कीच सक्षम नाही. ते हतबल आहेत अशी चर्चा सुरू आहे. या बाबत रेल्वे मंत्र्यांना विचारलं असता हे पुल तातडीने पूर्ण व्हावेत त्याचे काम युद्ध पातळीवर व्हावे म्हणून लष्कराला पाचारण करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली या तीन स्थानकांवर नवे पादचारी पूल उभे करण्याची घोषणा आज रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या तीनही पुलांचं काम ३१ जानेवारी २०१८ च्या आत करण्याचं उद्दीष्ठ लष्करानं ठेवलं आहे. दरम्यान एल्फिन्स्टन येथील पादचारी पूल बांधण्याचं काम ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. पुलासाठी आवश्यक सामुग्री तयार केल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या पुलाची पायाभरणी केली जाईल. पुढच्या १५ दिवसांत – म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत हा पूल बांधून तयार होईल आणि ३१ जानेवारीपर्यंत उर्वरित सर्व छोटी-मोठी कामं संपवून तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.

Related posts

अंबरनाथमध्ये मोरिवली एमआयडीसीत भीषण आग

News Desk

नालासोपारा स्फोटक प्रकरणात गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपींचा समावेश

Gauri Tilekar

अशी असेल माल्ल्याची आर्थर रोड कारागृहात व्यवस्था

News Desk