HW News Marathi
Uncategorized

आदित्य ठाकरेंचा ‘नाईट लाईफ’चा निर्णय लांबणीवर पडणार?

मुंबई | राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षी नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. नाईट लाईफबाबत विस्तृत प्रस्तावावर २२ जानेवारी रोजी कॅबिनेटमध्ये पहिल्यांदा चर्चा होणार आहे. त्यानंतरच नाईट लाईफसंदर्भात योग्य निर्णय होऊ शकेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, “आम्ही लवकरात लवकर या योजनेबाबत आढावा घेऊ. यानंतर या योजनेती अंमलबजावणी करायची की नाही यावर आम्ही निर्णय घेऊ. २६ जानेवारीपर्यंत या योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल असे मला वाटत नाही. अखेर हा विषय कॅबिनेटमध्ये येईल. तेथे यावर सविस्तर चर्चा होईल. त्याचा यंत्रणेवर किती परिणाम होऊ शकतो, यंत्रणा किती वाढवावी लागेल याचा विचार होईल. यानंतरच या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही यावर निर्णय होईल.”

मुंबईत २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् २४ तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. मात्र अनिल देशमुखांच्या वक्तव्यामुळे २६ जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार की नाही, असा प्रश्न गृहमंत्र्यांनी निर्माण केला आहे. सध्या पोलिसांवर मोठा ताण आहे. पोलीस १२ ते १४ तास रोज काम करत आहेत. इतक्या कमी वेळेत नाईट लाईफ सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रणा अजून तयार नाही. नाईट लाईफच्या निर्णयानंतर त्यासाठी अतिरिक्त पोलीस आहेत का? याची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटलांच्या बडबडीकडे शहारूखचे दुर्लक्ष

News Desk

‘राज्यपाल कोश्यारी यांनी देशाची माफी मागावी’, नाना पटोलेंची मागणी….!

News Desk

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्सची निर्मिती!

News Desk