HW News Marathi
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शिवसेनेचं मोठं विधान, शिवसेना काँग्रेसच्या वाटेवर!

News Desk

“ते २५ वर्षे शिवसेनेतच होते”, संजय राऊतांची राणेंवर टीका

News Desk

Sangram Jagtap| राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर.!

Arati More
देश / विदेश

मोदी सरकारविरोधात चार पक्षांचा अविश्वास प्रस्ताव

News Desk

नवी दिल्ली | मोदी सरकारविरोधात आतापर्यंत चार पक्षांनी अविश्वास प्रस्ताव दाखले केले आहेत. मंगळवारी हे प्रस्ताव संसदेच्या पटलावर येण्याची शक्यता आहे. यामध्ये तेलगु देसम पार्टी (टीडीपी), वायएसआर काँग्रेस,काँग्रेस आणि सीपीएम यांचा समावेश आहे. वास्तविक या अविश्वास प्रस्तावामुळे केंद्रातील भाजप प्रणित एनडीए सरकारला कसलाही धोका नाही. भाजप अध्यक्ष अमित शहांनी म्हटेल आहे की, अविश्वास प्रस्तावाचा सामान करण्यासाठी सरकार तयार आहे, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. दुसरीकडे, वायएसआर काँग्रेसने समोवारी म्हटले आहे, की त्यांचे सर्व खासदार राजीनामा देणार आहेत

Related posts

जीसी मूर्मू यांच्या जागी मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल

News Desk

कमांडर अभिनंदन यांच्या मुक्ततेच्या निर्णयाचे अमेरिकेकडून कौतुक

News Desk

नासाच्या कॅलेंडरसाठी भारतीय मुलांनी रेखाटलेल्या चित्रांची निवड

News Desk