HW News Marathi
Uncategorized

देशात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत भाजप ३४० अशा जागा विजयी मिळवून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. “सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत. मोदी पुढे ट्विटमध्ये म्हणतात आपण एकत्रत वाढतो. एकत्र यशस्वी होतो, आपण एकत्र सक्षम भारताची निर्मिती करू, भारत पुन्हा जिंकत आहे. विजयी भारत.” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत देशातील जनतेचे अभार मानले आहे.

देशात मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपने जवळपास १० राज्यामध्ये काँग्रेसचा सुफडासाफ करत एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३४० जागांवर आघाडीवर आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये दमदार विजय मिळवत ममता बॅनर्जीला मोठा धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशातही मागील पुनरावृत्ती करण्याचा मार्गावर भाजप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने केलेलं ट्विट भाजप नेत्याला पडले महागात

News Desk

आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या

News Desk

मी पवार आणि राष्ट्रवादीसोबतचं…मोहिते-पाटलांचे घुमजाव !

News Desk