HW News Marathi
Uncategorized

विद्युत नियामक आयोगाला राज ठाकरेंनी लिहिले पत्र

मुंबई | बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाकडून संपुर्ण मुंबईत वीजपुरवठा करण्यात येतो आणि याच वीज दरवाढीला मनसेने विरोध केला आहे. याप्रकरणी विद्युत नियामक आयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र दिल्याची माहिती सूत्रांमार्फत देण्यात आली आहे. बेस्टचा विद्युत विभाग कायम नफ्यात असतो. विद्युत विभागाचे काम चांगले आहे. मात्र, तुलनेने परिवहन विभाग कायम तोट्यात राहतो. त्यामुळे विद्युत विभागाला होणारा नफा परिवहन विभागाकडे जाण्यावरुन मनसेने आक्षेप घेतला आहे. बेस्टच्या वीजदरवाढीवर फेरविचार करण्यात यावा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी या पत्रात नमुद केली आहे.

बेस्टच्या परिवहन विभागाला होणार तोटा भरून काढण्यासाठी विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाला वळता करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत मनसेने हे पाऊल उचलले. या प्रकाराबाबत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना विचारले असता, विद्युत विभागाचा नफा अशा प्रकारे वळता केला जाऊ शकत नसल्याची त्यांनी माहिती दिली. आधीच देशात आलेल्या आर्थिक मंदीने जनता काळजीत आहे आणि त्यात आता वीज दरवाढीची चिंता मुंबईकरांवर लादू नका यासाठी राज ठाकरेंनी हे पत्र लिहिले. दरम्यान, वीजदरवाढीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसला तरी हे पत्र बेस्ट प्रशासनाने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला दिल्याची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग हिंदू धर्म सोडावाच लागेल !

News Desk

मुन्ना मायकल पुन्हा अँक्शन, डान्सचा थरार

News Desk

अपहरणाच्या धमकीनंतर विमान जमीनीवर

News Desk