HW News Marathi
Uncategorized

तिरंगा परिवारातर्फे १५ ऑगस्टला देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमासह पुरस्कार वितरण

शहीद संभाजी कदम यांना मरणोत्तर शान-ए-तिरंगा, तर सकाळचे संजय कुलकर्णी व सामनाचे विजय जोशी यांना राज्य स्तरीय विशेष गौरव पुरस्कार

उत्तम बाबळे

नांदेड :- गेल्या बारा वर्षापासून स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीची भावना रुजविणाऱ्या तिरंगा परिवाराच्यावतीने यावर्षीदेखील जल्लोषपूर्ण देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम आयोजित केला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यात यावर्षीचा शान-ए-तिरंगा हा पुरस्कार शहीद संभाजी कदम यांना मरणोत्तर, तर तिरंगा रत्न राज्य स्तरीय पुरस्कारात दै. सकाळचे नांदेड आवृत्ती प्रमुख संजय कुलकर्णी व विशेष कार्य गौरव पुरस्कारात दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांना देण्यात येऊन गौरविण्यात येणार आहे.

मागील बारा वर्षापासून तिरंगा परिवार हा विविध समाज उपयोगी उपक्रमातून समाजसेवा तर करतच आहे सोबत देशभक्तीची भावना जागृत व्हावी यासाठी १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम सातत्याने आयोजित करीत असते.तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील गौरवित असते. यावर्षी देखील विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, भरीव योगदान देणा-या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षीचा शान-ए-तिरंगा हा मरणोत्तर पुरस्कार शहीद संभाजी कदम जानापुरी यांना जाहीर करण्यात आला असून,तिरंगा रत्न राज्य पुरस्कारात मालपाणी मतिमंद व मूकबधीर विद्यालय या संस्थेचा समावेश आहे. सर्पाबाबात जागृती करणारे मुखेडचे डॉ. दिलीप पुंडे, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे के. टी. सिद्दीकी तसेच वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या ३० वर्षापासून कार्यरत असलेले दै.सकाळचे आवृत्ती प्रमुख संजय कुलकर्णी, उद्योजक रमेश पारसेवार व रामचंद्रराव भाकरे यांचा तिरंगारत्न राज्य पुरस्कारात समावेश आहे. तर यावर्षीपासून सुरू झालेल्या विशेष कार्यासाठी कार्यगौरव पुरस्काराची घोषणाही आज तिरंगा परिवाराचे मिर्झा फैय्याज बेग यांनी केली. यात वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच देशभक्तीची भावना जागृत करणारे दै.सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, अण्णाराव मुंडे मुखेड, जगदीश पाटील जोगदंड, पूर्णा, डॉ. किरण चिद्रावार, मोहम्मद रईस खतीब यांचा यात समावेश करण्यात आला आहे. तसेच नवज्योत फाऊंडेशन व कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ सिडको यांना देखील यावेळी गौरविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:०० वाजता कुसूम सभागृह,नांदेड येथे हा सोहळा साजरा होणार असून देशभक्ती गितांचा कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक मिर्झा पैय्याज बेग (तिरंगा परिवार) यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पुण्यामध्ये tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला?महाविकाआघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर भाजपचे गंभीर आरोप !

News Desk

भारताची नवी खेळी, पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तामध्ये पाठवला गहू

News Desk

सामुहिक बलात्कार प्रकरणात, पाच पोलिस अधिकारी निलंबित

News Desk