HW News Marathi
Uncategorized

‘पुण्यामध्ये tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला?महाविकाआघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर भाजपचे गंभीर आरोप !

पुणे | गेली १४ वर्ष पत्रकारिता श्रेत्रात काम करणाऱ्या पांडुरंग रायकर यांना कोरोनाकाळात पुण्यात वेळेत अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युनंतर सर्व स्तरांतुन हळहळ व्यक्त होत असली तरी प्रशासन आणि आरोग्यव्यवस्था यांच्या गलथान कारभारामुळे एका पत्रकाराला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतो आहे. त्यांच्या मृत्युची चौकशी करण्याचे आदेश सध्या देण्यात आले आहेत मात्र सरकराच्या या कारभारावर भाजपने गंभीर आरोप केले आहेत.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

‘एक होतकरू पत्रकार आज दुर्दैवाने मृत्युमुखी पडला आहे आणि आता त्यांचे निधन झाल्यानंतर चौकशी करून काय उपयोग? त्यातून काय साध्य होणार? पुण्याला मुख्यमंत्री येऊन गेले. तेथे कोविड सेंटर व आरोग्य व्यवस्था उभी केली, पण त्याला जर आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसेल तर त्याचा काय उपयोग? सरकारच्या अव्यवस्थेमुळे पांडुरंग रायकर यांचा नाहक बळी गेला आहे. रायकर यांना उपचारासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही व बेडही मिळाला नाही. पत्रकाराच्या मृत्यूला यंत्रणेतील अव्यवस्था व महाविकास आघाडीचे सरकारच या मृत्यूला जबाबदार आहे’.

भाजप आमदार नितेश राणे

‘पुण्यामध्ये tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला? हे सत्य आहे कारण या महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे जीव गेला!कोरोना काळात निःस्वार्थी भावनेनी सेवा देणारे पत्रकार ही सुरक्षित नाहीत! त्या COVID centre चे उदघाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या तीच खरी श्रद्धांजली!’

 

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना भाजपकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हासनगरमध्ये राजकीय वैमनस्यातून तुफान हाणामारी

News Desk

सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार आज घेणार सोनिया गांधींची भेट

News Desk

दारूबंदी असताना दारू पिऊन पाच ठार

News Desk