HW News Marathi
Uncategorized

राष्ट्रवादीच्या खासदारांनो दिल्लीला जाऊ नका ,शरद पवारांची सुचना

मुंबई | देशभरात कोरोनाचा हाहाःकार वाढतो आहे,सरकारने त्या दृष्टीने पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. ३१ मार्चपर्यंत ३ राज्य लाॅकडाऊन करण्यात आली आहेत तर भारतीय रेल्वेसुद्धा बंद करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खासदारांना सूचना दिल्या आहेत. शरद पवारसुद्धा शासनाचा आदेश पाळत वर्क फ्राॅम होम करत आहेत .पवारांनी ट्विट करत राष्ट्रवादीच्या खासदारांनी दिल्लीला परत जाऊ नये अशा सुचना केल्या आहेत

संकट गंभीर असले तरीही सरकार खंभीर आहे, असा धीर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला दिला आहे. राज्यात आज (२२ मार्च) मध्य रात्रीपासून नाईलाजाने १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमत्र्यांनी केली. या काळात ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कालपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्के होती.आजपासुन फक्त ५ टक्के सरकारी कर्मचारी काम करणार आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्र्यांच्या ‘आधार’ कार्डची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे नाही

News Desk

मुन्ना मायकल पुन्हा अँक्शन, डान्सचा थरार

News Desk

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

News Desk