HW News Marathi
Uncategorized

शरद पवारांनी घेतली शेलारांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जावून भेट घेतल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. ही भेट राजकीय कारणांसाठीच ही भेट असल्याचे बोलले जात आहे. परंतु शरद पवारांनी सपत्नीक शेलार यांची भेट घेतल्यामुळे या भेटीमागे वेगळे कारणदेखील असण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्यांनी मात्र याबाबत अद्याप काहीही खुलासा केलेला नाही. काही दिवसांपूर्वी बीकेसीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थित भाजपचा मेळावा झाला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्या टिकेला उत्तर दिले होते. पवारसाहेब, चहावाल्यांच्या नादी लागू नका, तुमचे नमोनिशान उरणार नाही, असे प्रतित्तुर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच छगन भुजबळ यांच्यालगतच्या कोठड्या रिकाम्या असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यातून अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याची भाजपने सूचित केले होते. त्यामुळे कदाचित शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली असावी, असा एक कयास लावला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’विरोधात आज काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन

News Desk

गुजरात निवडणूक 2017 : तारखा जाहीर, दोन टप्प्यात मतदान

News Desk

देशात गेल्या २४ तासात ९१९ नवे रुग्ण, ३१ जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू | केंद्रीय आरोग्य मंत्रालय

News Desk
महाराष्ट्र

भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा जिल्हाशी संपर्क तुटला

News Desk

गडचिरोली | सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला असून, पुलावरुन ३ फूट पाणी वाहू लागल्याने तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.मागील पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. धानपिकाची रोवणी केलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या स्त्रोतामधून पाणी आणून पीक वाचविण्याची धडपड करावी लागली, तर ज्यांची रोवणी करावयाची होती, त्यांच्यापुढे दुष्काळाचे सावट उभे राहिले होते.

मात्र, परवा रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. काल रात्री सर्वत्र दमदार पाऊस पडला. भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे सर्वाधिक २२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल भामरागड येथे २०७ मिलिमीटर, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे १४७.४ मिलिमीटर, सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे १३९ मिलिमीटर, एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथे १२३.२ मिलिमीटर व कसनसूर येथे १२२.६ मिलिमीटर पाऊस पडला. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन काल रात्री ३ फूट पाणी वाहत होते.

पहाटेला पूर ओसरला. परंतु आज सकाळी पुन्हा पुलावरुन पाणी वाहू लागले. हेमलकसा गावाच्या अलिकडे असलेल्या कुमरगुडा येथील नाल्यालाही पूर आला आहे. त्यामुळे त्या भागातील शंभर गावांचा संपर्क तुटला होता. सिरोंचा तालुक्यातील बामणी-टेकडाताला मार्गाचा संपर्क तुटला आहे. चामोर्शी तालुक्यातील दिना नदी, कुरखेड्यातील सती नदी, गडचिरोलीनजीकची कठाणी नदी, पोटफोडी नदी व आरमोरीनजीकची गाढवी नदी व अन्य नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Related posts

आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून काम करा! – मुख्यमंत्री

Aprna

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna