HW News Marathi
Uncategorized

आम्ही छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचे वंशज,औरंगजेबाचे नाही ! औरंगाबादचं संभाजीनगर करणार ..

औरंगाबाद | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनासुद्धा आता औरंगाबाद नामांतराच्या वादात उडी घेतली आहे. याआधी शिवसेना आणि मनसे या मुद्द्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळालं होतं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही,त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर झालंच पाहिजे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली . त्यानंतर तिथला संघटनात्मक आढावाही घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल आहे. त्या याचिकेच्या सुनावणीच्या प्रक्रियेला गती देऊन शहराचे नाव बदलले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा महाराष्ट्राचा शत्रू होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे”, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Karuna Sharma यांच्या बाजूने पंकजा मुंडे सरसावल्या, Dhananjay Munde यांच्यावरती कडाडून टिका !

News Desk

मी देवेंद्र फडणवीसांना विचारले मग कसे काय पाऊसपाणी ?

News Desk

शास्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण

News Desk