HW News Marathi
Uncategorized

मुंबई हल्ल्यामुळे आमची इज्जत गेली: पाक

इस्लामाबाद(वृत्तसंस्था:) भारतातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणूनही कुप्रसिद्ध असलेल्या २६-११ च्या हल्ल्यामुळे आपली प्रतिमा जगभरात मलीन झाल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव रियाज मोहम्मद खान यांनी याबाबत खुलासा केला. या हल्लामुळे पाकिस्तानच्या काश्मिर मोहिमेला देखील खूप मोठे नुकसान झाले आहे.

२६ सप्टेंबर २००८ रोजी पाकिस्तानच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत सागरी मार्गे घुसून दहशतवादी हल्ला केला. यात परदेशी नागरिकांसह १६६ जणांचा बळी गेला होता. रियाज मोहम्मद खान यांनी मुंबई हल्ल्यांवरील वक्तव्य वॉशिंग्टन येथे पाकिस्तानच्या दूतावासात केले आहे. या कार्यक्रमात पाकिस्तानचे इतर महत्वाचे मुत्सद्दी अधिकारी आणि नागरिक देखील उपस्थित होते. मुंबई हल्ल्यात अजमल आमिर कसाब या एकमेव दहशतवाद्याला भारताने जिवंत पकडले होते. त्यानेच हल्ल्यासाठी १० दहशतवादी पाकिस्तानहून भारतात घुसल्याची कबुली दिली होती. त्याला फासावर लटकवण्यात आले आहे. खान यांनी त्याच मुंबई हल्ल्याचा उल्लेख करताना आपल्या देशाची इमेज जगभरात मलीन झाली असे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…आणि छगन भुजबळ, फडणवीस आले एकाच व्यासपीठावर एकत्र

swarit

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्सची निर्मिती!

News Desk

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत –  रविशंकर प्रसाद

News Desk
महाराष्ट्र

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव-शरद पवार एकत्र

News Desk

मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खूद्द शरद पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

या भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांच्या निवासस्थानी 10 दिवसांपूर्वी ही भेट झाली. या भेटीची राजकीय वतुर्ळात मात्र वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे. तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दूरावा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले आहे.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. राणे सत्तेत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे संकेत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, त्यामुळे या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Related posts

मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचं आंदोलन तात्परतं मागे घेत आहोत! – नाना पटोले

Aprna

DCP सौरभ त्रिपाठी अंगडिया खंडणी प्रकरणाची उद्या सत्र न्यायालयात होणार सुनावणी

Aprna

MPSCExam : विद्यार्थ्यांच्या राहण्याचा सर्व खर्च सरकारने उचलावा,भाजप नेत्याची मागणी

News Desk