HW News Marathi
Uncategorized

मुंबई हल्ल्यामुळे आमची इज्जत गेली: पाक

इस्लामाबाद(वृत्तसंस्था:) भारतातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणूनही कुप्रसिद्ध असलेल्या २६-११ च्या हल्ल्यामुळे आपली प्रतिमा जगभरात मलीन झाल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव रियाज मोहम्मद खान यांनी याबाबत खुलासा केला. या हल्लामुळे पाकिस्तानच्या काश्मिर मोहिमेला देखील खूप मोठे नुकसान झाले आहे.

२६ सप्टेंबर २००८ रोजी पाकिस्तानच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत सागरी मार्गे घुसून दहशतवादी हल्ला केला. यात परदेशी नागरिकांसह १६६ जणांचा बळी गेला होता. रियाज मोहम्मद खान यांनी मुंबई हल्ल्यांवरील वक्तव्य वॉशिंग्टन येथे पाकिस्तानच्या दूतावासात केले आहे. या कार्यक्रमात पाकिस्तानचे इतर महत्वाचे मुत्सद्दी अधिकारी आणि नागरिक देखील उपस्थित होते. मुंबई हल्ल्यात अजमल आमिर कसाब या एकमेव दहशतवाद्याला भारताने जिवंत पकडले होते. त्यानेच हल्ल्यासाठी १० दहशतवादी पाकिस्तानहून भारतात घुसल्याची कबुली दिली होती. त्याला फासावर लटकवण्यात आले आहे. खान यांनी त्याच मुंबई हल्ल्याचा उल्लेख करताना आपल्या देशाची इमेज जगभरात मलीन झाली असे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक: व्हॉट्सअॅप हॅकर अटक

News Desk

ग्रामीण भागातही एनसीसीची विस्तार-सुभाष भामरे

News Desk

राज्यात ‘कोरोना’ उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित

News Desk