HW News Marathi
महाराष्ट्र

नाताळ अन् नवीन वर्षासाठी राज्य सरकारकडून नवे निर्बंध

मुंबई | राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच राज्यात नाताळ आणि नववर्षामुळे उत्साह व पार्ट्यांचे सर्वत्र वातावरण असल्यामुळे काल (२४ डिसेंबर)  राज्य सरकारने नवे निर्बंध लावले आहेत. या नियमानुसार, राज्यात काल रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येऊ शकत नाही.  सध्या राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १०८ वर गेली आहे.    

३१ डिसेंबरला चालू वर्षाला निरोप देण्यासाठी आणि १ जानेवारी २०२२च्या स्वागतसाठी मुंबई अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले  मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया, जूह बीच, मोठ-मोठी हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नियमानुसार, चर्चमध्ये आयोजित केलेल्या मासमध्ये ५० टक्के लोकांपेक्षा जस्त लोक उपस्थित नसावी. चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. 

असे आहेत नवे निर्बंध

  • बंदिस्त जागेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात जागेत ५० टक्के क्षमतेने लोकांची उपस्थित राहावे. ज्या ठिकाणी आसनक्षमता नसेल, त्या ठिकाणी २५ टक्के लोकांनीच उपस्थि रहावे. तसेच खुल्या जागेत २५ टक्के उपस्थिती चालू शकते.
  • क्रीडा स्पर्धा, खेळाच्या कार्यक्रमात आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसावे. 
  • विवाह सोहळ्यासाठी एकावेळी १०० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती नसावी. तर खुल्या जागेत विवाह सोहळा असेल, तरजागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांची उपस्थिती असावी
  • सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि इतर कार्यक्रमांसाठी उपस्थितांची संख्या १०० च्यावर नसावी. तर खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल तितकी राहील. या कार्यक्रमासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या निश्चित करेल
  • उपाहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील
  • प्रभू येशुचे स्तुतीगीत गाण्यासाठी कमी गायकांचा समावेश करावा. गाणे गाण्यासाठी वेगवेगळ्या माईकचा वापर करावा, चर्चाच्या बाहेर दुकाने किंवा स्टॉल लावू नको. 
  • फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?, आशिष शेलारांचा आरोप

News Desk

अर्नाळामध्ये सापडला टाईम बॉम्ब

swarit

तर ऑफलाईन पद्धतीनेही लस द्या, राजेश टोपेंच्या सूचना!

News Desk