HW News Marathi
महाराष्ट्र

’19 दिवसात दिले तब्बल 10 कोटी डोस’, देशात लसीकरण वेगाने!

मुंबई। गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनाचा कहर सुरू असून अद्याप तो सुरूच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी कोरोना लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. महामारीच्या सुरुवातीला देशात संथ गतीने लसीकरण केले जात होते. पण आता नागरिकांना अतिशय वेगाने लसी दिल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांबद्दल सांगायचे झाले तर अवघ्या १९ दिवसात १० कोटी डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती देशाचे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, भारताने पहिल्या १० कोटी डोस देण्यात ८५ दिवस, २० कोटी ४५ दिवस, ३० कोटी २९ दिवस, ४० कोटी २४ दिवस, ५० कोटी २० दिवस आणि आता ६० कोटी लसीकरण पूर्ण करण्यासाठी फक्त १९ दिवस लागलेत. ज्या वेगाने लसीकरण केले जात आहे त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

२ कोटी अतिरिक्त डोस दिले जाणार

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी असे सांगितले की, ऑगस्ट महिन्यात सर्व राज्यांना लसीचे २ कोटी अतिरिक्त डोस दिले जाणार आहे. यासह, त्यांनी ५ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या शिक्षक दिनापूर्वी सर्व राज्यांच्या शिक्षकांना प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.देशात १६ जानेवारी रोजी देशव्यापी लसीकरण मोहीमेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणासह सुरू करण्यात आले होते तर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे लसीकरण २ फेब्रुवारीपासून सुरू झाले होते. यानंतर कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा १ मार्चपासून सुरू झाला असून त्याअंतर्गत ६० वर्षांवरील लोक आणि ४५ आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसह आजारी लोकांना लसी देण्यास सुरूवात करण्यात आली. देशाने १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व लोकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले.१ मे पासून १८ वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण करण्याची परवानगी देऊन सरकारने लसीकरण मोहिम वेगाने करण्याचा निर्णय घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्मृती इराणी विरोधात हडपसर पोलिसांत तक्रार

News Desk

कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

Aprna

पवारसाहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला; निलेश राणेंची बोचक टीका

News Desk