HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्याची अजब मागणी! २ एकरात गांजा लावण्याची परवानगी द्या… अन्यथा….

मोहोळ | राज्यात शेतकरी सध्याच्या परिस्थितीमुळे त्रासलेला आहे. वाढती महागाई, नैसर्गिक आप्पती आणि इत्तर कारणांमुळे शेतकरी त्रासलेला आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या राज्यातील बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. या सगळ्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात गांजा उगवण्याची परवानगी मागितली आहे.

गांजा लावण्याचो परवानगी द्या

मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील अनिल आबाजी पाटील या शेतकऱ्याने सरकारने दोन एकरात गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देऊन राज्य सरकारकडे मागणी केली आहे. “त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्याने मला माझ्या दोन एकर शेतीत गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. १५ सप्टेंबरपर्यंत परवानगी न मिळाल्यास १६ तारखेला परवानगी मिळाली, असे गृहित धरून लागवड करणार आहे. गुन्हा दाखल झाल्यास आपले प्रशासन जबाबदार राहिल “असे त्यांनी म्हटले आहे.

कोण आहे हा शेतकरी?

अनिल पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याची शिरपूर ता. मोहोळ येथे स्वतःच्या मालकीची 2 एकर जमीन आहे याच 2 एकर क्षेत्रात गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. कोणतेही पीक लागवड केले तरी त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्यामुळे त्याला त्याची शेती तोट्यात करावी लागत आहे असल्याचे कारण सांगत त्याने ही अजब मागणी केली आहे.

पिकाला कवडीमोल भाव मिळत आल्यामुळे शेती करणे कठीण झालं. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखाण्याला ऊस गाळपासाठी दिला असता, त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही, त्यामुळे गांजाला भाव असल्यामुळे या शेतकऱ्याने दोन एकर गांजा लागवड करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागणी केली आहे.

परवानगी द्यावी अन्यथा गृहीत धरून गांजा लागवड सुरु करू

15 सप्टेंबर पर्यंत लेखी परवानगी द्यावी अन्यथा 16 सप्टेंबर पासून शेतकरी आपल्याला प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे असे गृहीत धरून गांजा लागवड सुरु करणार आहे अशी माहिती शेतकऱ्याने दिली आहे. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्यास प्रशासन जबाबदार राहील असेही या शेतकऱ्याने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टिकणारचं! – शरद पवार

News Desk

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार! – मुख्यमंत्री

Aprna

आदित्य ठाकरेंवर बोलताना नितेश राणेंची घसरली जीभ, नितेश म्हणाले,’शब्द मागे घेतो’!

News Desk