HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव इतिहास शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना रामदास आठवले पत्र लिहिणार

पुणे | भीमा कोरेगाव येथील लढाईचा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश झाला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले यांनी केली आहे. भीमा कोरेगाव इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. त्यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहीन व त्यांच्याशी चर्चाही करेन, असे रामदास आठवले यांनी सांगितले आहे रामदास आठवले यांनी आज (१ जानेवारी) कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

देशात दलित समाजावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. त्यासाठी देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. तसेच देशातील दलित-सवर्ण हा वाद मिटला पाहिजे. गावागावात एकी झाली पाहिजे. सवर्ण आणि दलितांमध्ये एकी झाली की, देशाचा विकास झपाट्याने होईल.२०२१ मध्ये दलितांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला.

नवीन वर्षात रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करण्याचा आमचा संकल्प आहे. ‘मी रिपब्लिकन’ ही आमची घोषणा असेल, असे आठवलेंनी सांगितले आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी कोणतीही ठोस योजना नसल्याचे म्हटले होते. या टीकेला रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याकडे कोणताही प्लॅन नाही, हे मला माहिती आहे. पण केंद्र सरकारकडे अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ठोस योजना आहे. आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर मदत केली जाईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये , राऊतांचा भाजपला टोला!

News Desk

कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात-महेश तपासे

News Desk

सोलापुरात डेंग्युचा दुसरा बळी

News Desk