HW News Marathi
महाराष्ट्र

‘केवढ्याला पडलं तुम्हाला? फुग्याला भोक तुमच्या पडलं!’ भाजपचं सामन्यावर प्रत्युत्तर

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल(२४ ऑगस्ट) कोर्टाने जमीन दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने त्यांच्यावर कारवाई केली गेली होती पण त्यांना जमीन मिळाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या(२५ ऑगस्ट) सामना अग्रलेखातून नारायण राणेंवर टीका केली आहे. शिवसेनेच्या या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे. आमच्या नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

राऊतांचं सकाळचं प्रवचन ठरलेलं आहे

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चूक झाकण्यासाठी भाजप नेते नारायण राणेंचं वक्तव्य लावून धरण्यात आलं. केवढ्याला पडलं तुम्हाला? फुग्याला भोक तुमच्या पडलं. आमच्या नाही. आम्ही ‘सामना’च्या अग्रलेखाला किंमत देत नाही. राऊतांचं सकाळचं प्रवचन ठरलेलं आहे. राऊत तुमच्यावर एका महिलेने आरोप केले, तिला जेलमध्ये जायला भाग पाडलं. किती हा सत्तेचा दुरुपयोग, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

शोधून थोबाडीत मारणार असंही म्हटले नाही

चंद्रकांत पाटलांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरे चुकले. त्यामुळे मी तिथे असतो तर थोबाडीत मारली असती, असं राणे म्हणाले. थोबाडीत मारण्यासाठी मातोश्रीवर जाणार असं त्यांनी म्हटलं नाही. शोधून थोबाडीत मारणार असंही म्हटले नाही. मुख्यमंत्री असून एवढं कळत नाही का? हा कॉमन संवाद आहे. एक लावून दिली असती असं म्हटलं जातं. पण मीडियाने हे वाक्य लावून धरलं. राणेंची एक भाषा आहे. त्यांची एक शैली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

रात गई बात गई

भाजप कधीही मनात खुन्नस ठेवून लाँग टर्म काम करत नाही. रात गई बात गई. राणेंना जामीन झालेला आहे. राणेंची खूप तब्येत बिघडली. जेवताना त्यांच्या हातातील ताट काढून घेण्यात आलं. हे अमानवी होतं. त्यांचं बीपी वाढलं होतं. त्यांना कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट दिली नाही. अडीच तास संगमेश्वर पोलीस ठाण्यात बसून ठेवलं. हे अत्यंत अमानवी झालं. ते एखाद दिवस आराम करतील. शुगर, बीपी नॉर्मल झालं की बहुदा उद्या यात्रा सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

अरे वा सिंधुदुर्गातच प्रॉब्लेम आहे का?

सरकारने काल(२४ ऑगस्ट) सिंधुदर्गात संचारबंदी लागू केली होती. अरे वा सिंधुदुर्गातच प्रॉब्लेम आहे का? संपूर्ण महाराष्ट्र पेटला. सगळीकडेच संचारबंदी लावा. संचारबंदी लावल्याने काय होतंय? राणेंच्या यात्रेला मुंबईत प्रचंड प्रतिसाद मिळाला. महापालिका हरली तर काय राहीलं? असं वाटल्यानेच त्यांनी हा प्रकार केला. हे उशिरा सूचलेलं शहाणपण आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचा हा प्रयत्न आहे. राणे एवढे ठोकतात तुम्ही काहीच बोलत नाहीत. त्यामुळेच हा लटका प्रयत्न झाला. त्यातूनच सिंधुदुर्गात संचारबंदी लावण्यात आली आहे. त्याने आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. राणेंच्या तब्येतीमुळेच आम्ही थांबलो. उद्या सकाळी त्यांची तब्येत बरी झाली तर जन आशीर्वाद सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी नेते आक्रमक, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

News Desk

मंत्री धनंजय मुंडेंकडून राजीनामा घ्यावा, शरद पवारांकडून हीच नैतिकता अपेक्षित ! | चंद्रकांत पाटील

News Desk

पार्थ प्रकरणानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीला..

News Desk