HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार येणारच, फक्त आता महाराजांचा गनिमी कावा! 

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज (२८ नोव्हेंबर) सत्ताधारू आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. भाजप नेते महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर, आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा सरकार पाडण्याचा स्पष्ट दावा केला आहे. “राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार नक्की येणार. आता आम्ही शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने वागणार”, असा स्पष्ट इशारा प्रवीण दरेकरांनी दिला आहे.

प्रवीण दरेकरांनी नुकतंच एक विधान केलं होतं ज्यात ते म्हणाले होते की, “राज्याच्या आमचं सरकार येणारच. फक्त आता आम्ही आज येणार, उद्या येणार की परवा हे सांगत बसणार नाही.” त्यानंतर आता लगेच पुन्हा एकदा दरेकरांनी हे नवं विधान करून इशारा दिला आहे. “राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे सरकार येणार आहे. कधी येणार तेही आम्ही सांगणार. आता फक्त आम्हीथोडं शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार”, असं दरेकर म्हणाले.

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी म्हणाले जनतेनं आम्हाला आपलं मानलं. पण सरकारनं जनतेला आपलं मानलं नाही. गेली २ वर्षे राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही. यातून फक्त आमचंच सरकार मार्ग काढू शकतं.” त्याचप्रमाणे, यावेळी दरेकर यांनी आणखी एक स्पष्टीकरण दिलं. “चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्याव आहेत. ह्या चर्चा मी तुमच्याकडूनच ऐकतो आहे. मात्र, असं काहीही नाही”, असं प्रवीण दरेकरांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यूपी विधानसभा निवडणुकीआधी मायावती यांची ब्राम्हण समाजासाठी मोठी घोषणा!उ

News Desk

उदयनराजे भोसले यांनी ‘या’ कारणामुळे घेतली थेट शरद पवारांची भेट!

News Desk

फडणवीसांनी ‘आमचे मार्गदर्शक’ असा बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत केले ट्विट 

News Desk