HW News Marathi
महाराष्ट्र

“अनिल बोंडें याचं मानसिक संतुलन बिघडले आहे” -अशोक चव्हाण

नांदेड। गेल्या काही दिवसांपूर्वी त्रिपुरातील कथित घटनेनंतर महाराष्ट्र देखील त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले होते. विशेषता महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर या दंगली, जाळपोळ, हाणामारी झाली होती.आणि याच हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आता चांगलंच तापलं आहे. या दंगलीची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी काल (२२ नोव्हेंबर) भाजपकडून राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. नांदेडमध्येही माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी बोंडे यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. बोंडेंच्या या टीकेला आता अशोक चव्हाण यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय

अनिल बोंडेंचे मानसिक संतुलन बिघडले

अनिल बोंडेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यांनी इथून येऊन मला शहाणपणा शिकवू नये असे प्रतिउत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बोंडे यांना दिले. नांदेड मध्ये झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ भाजपातर्फे निदर्शने करण्यात आली. स्वताचे अपयश लपवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी दंगल प्रायोजित केली का असा गंभीर सवाल अनिल बोंडे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थित केला होता. त्यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिउत्तर दिले.नांदेडमधील दंगलखोरांना राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी अशोक चव्हाणांवर केलाय. दंगलीत आरोपी असलेल्या बोंडे यांनी इथे येवून शहाणपणा करु नये. त्यांचे माझ्यावरील आरोप हे हास्यास्पद आहे, अशी जहरी टीका आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या कडून अनिल बोंडे यांच्यावर करण्यात आली आहे. मानसिक संतुलन बिघडल्यासारखे बोंडे बोलत आहेत, अशी खोचक टीका अशोक चव्हाण यांनी केलीय.

अनिल बोंडे यांचा अशोक चव्हाण यांच्यावर आरोप?

गेल्या काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे पडसाद हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले होते, आणि याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये झालेल्या दंगलीचे कटकारस्थान करणाऱ्यांना राजाश्रय असल्याचा खळबळजनक आरोप अनिल बोंडे यांनी केलाय. अमरावती, मालेगाव आणि नांदेड इथल्या दंगलखोरांवर कारवाई करा, अशी मागणी करत भाजपनं धरणं आंदोलन केलं. नांदेडमध्ये अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. यावेळी बोंडे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नांदेडमध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित होती आणि दंगलखोरांना राजाश्रय दिला जात आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असी मागणीही बोंडे यांनी केली आहे. आणि जिल्हाधिकार्यालय समोर आंदोलन करताना अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर जहरी शब्दात टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांदा खरेदीनंतर साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

News Desk

रंगभूमीनंतर आता प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

News Desk

#MahalaxmiExpress : ५०० प्रवाशांना एनडीआरएफने वाचविले

News Desk