HW News Marathi
महाराष्ट्र

वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी उत्तर प्रदेशात कंगणा विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल!

मुंबई। अभिनेत्री कंगना रनौत ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय बनली आहे. कधी महाविकासआघाडीवर आरोप करत असते तर कधी कंगना चक्क भारताच्या स्वातंत्र्यावरच बडबडते करण मुक्तच कंगना रनौतने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. आणि आता याच पार्श्वभूमीवर अर्थातच 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य नाही भीक मिळाली असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतवर यूपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील विकास तिवारी यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील ACJM III च्या कोर्टात कंगना रनौत विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता 29 नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आल आहे.

रनौतविरोधात कोर्टात केस दाखल

अवधेश तिवारी आणि अवनीश चतुर्वेदी या वकिलांच्या माध्यमातून विकास तिवारीने अभिनेत्री कंगना रनौतविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. त्यांनी कंगनावर आरोप केला की, 11 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता विविध वर्तमानपत्रे, चॅनेल आणि आदी माध्यमांवर ऐकले की, कंगनाने 1947च्या स्वातंत्र्याला भीक मागणे म्हटले आहे. भारताला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, असेही कंगनाने सांगितले. असे वक्तव्य करून कंगनाने स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप आता उत्तर प्रदेश मधल्या वकिलाने केला आहे.

समन्स बजावून शिक्षा द्यावी

कंगना रनौत ने तिचं वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणारे भाष्य केल्यामुळे जन माणसातल्या भावना या विधानामुळे दुखावल्या गेल्या होत्या. असे देखील तक्रारदाराच म्हणणं आहे. त्याबरोबरच देशाच्या एकात्मतेवर आणि अखंडतेवर विपरीत परिणाम होऊन देश गृहयुद्धाकडे जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तक्रारदार आणि साक्षीदारांच्या भावना दुखावल्या. आरोपींना समन्स बजावून शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

‘भिक मागून स्वातंत्र्य….’

कंगना रानौत हिच्या ‘भिक मागून स्वातंत्र्य मिळाले आहे’ या विधानावरचा वाद थांबत नाही तोच तिने पुन्हा एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. कंगना रानौतने सोशल मीडियावर महात्मा गांधींना भुकेले आणि धूर्त संबोधणारी पोस्ट शेअर केली आहे. भगतसिंहला फाशी द्यावी अशी महात्मा गांधी यांची इच्छा होती, असेही त्यांनी म्हटले होते. कंगनाने इंस्टा स्टोरीवर एका जुन्या वृत्तपत्रातील एक लेख शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुम्ही एकतर गांधींचे चाहते किंवा नेताजींचे समर्थक असू शकता. तुम्ही दोघांचे असू शकत नाही. ते तुम्हीच ठरवा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वानखेडेंचे वैयक्तिक आयुष्य आणि ड्रग्जचा काय संबंध? क्रांती रेडकर भडकल्या

News Desk

पुण्यातील कोंढवा बुद्रुकमध्ये बनावट पनीर कारखान्यावर कारवाई

Manasi Devkar

शिवसेनेनं काँग्रेसचे मन परिवर्तन करावं, चंद्रकांत पाटलांचा सेनेला सल्ला 

News Desk