HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्यातील विविध जिल्ह्यात एकाच वेळी ऐवढे मोठे मोर्चे कसे निघालं?” – फडणवीस

मुंबई | “राज्यातील विविध जिल्ह्यात एकाच वेळी ऐवढे मोठे मोर्चे कसे निघाले ? यावरुन हा सुनियोजित कट होता हे दिसून येतं,” असा सवाल विधान सभेचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. “या फेक न्यूजच्या आधारावर हे मोर्चे कोणी काढलं. या मागची भूमिका काय होती?, ” यांची चौकशी झाली पाहिजं, अशी मागणी फडणवीसांनी आज (२१ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून घेतली.

“त्रिपुरात जी घटना घडलेली नाही, त्यावर मोर्चा काढणं हे चुकीचं आहे. खोट्या माहितीच्या आधारीत मोर्चा काढला गेला. कुराण शरीफ जाळतात असं दाखवण्यात आलं. तो दिल्लीच्या कॅम्पमधील व्हिडिओ होता. पाकिस्तानातील फोटो होते,” असे फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं. राज्यातील विविध जिल्ह्यात एकाच वेळी ऐवढे मोर्चे कसे निघातात, हे आता ठरवले आणि निघालं असे नाही, हे सुनियोजीत मोर्चे आहेत, पहिल्यांदा तर यांची चौकशी झाली पाहिजं, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

१२ तारखेच्या मोर्चाची चौकशी

फडणवीस पुढे म्हणालं, “१२ तारखेला आपण बघितलं की, अशाच प्रकारचा मोर्चा अमरावतीमध्ये निघाला. सर्व प्रथम याला परवानगी होती की नव्हती?. होती तर किती लोकांची परवानगी होती? ती परवानगी कोणी दिली होती?. ज्यांनी परवानगी दिली होती?, त्यांनी काय म्हणून दिली होती?. या सर्वांची चौकशी झाली पाहिजं.”

१३ तारखेला जी घडना घडली, ती १२ तारखेच्या घटनंची प्रतिक्रिया

नांदेड, मालेगाव, अमरावती किंवा राज्यातील इतर भाग असेल एकाच दिवशी एकाच वेळी हे मोर्चे निघालं. सर्वत पहिल्यांदा तर यांची चौकशी झाली पाहिजं, अशी मागणी फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. “१३ तारखेला जी घटना घडली, ती १२ तारखेच्या घटनंची प्रतिक्रिया होती. १३ तारखेला जी काही हिंसा झाली. त्यांचे समर्थन मी करणार नाही. कोणत्याच हिंसेचे समर्थन केले जावू शकत नाही. हे सांगण्याचं कारण या करिता आहेत. आता राज्य सरकार, सरकारमधील अधिकारी, अमरावती जिल्ह्यातील मंत्री, पालकमंत्री हे सगळे १२ तारखेची घटना डिलीट करून जनू १३ तारखेची घटनेबद्दल बोलत आहेत,” असा आरोप फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार – उदय सामंत

News Desk

‘105 असूनही सत्तेत नसल्याने कांड्या पेटवतायत’ अजित पवार भाजपवर बरसले

News Desk

पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि खाजगी विकासकांमध्ये करार

Aprna