HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार, उद्धवचा काळ संपला”!

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. मुंबई विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत. आपल्याला आपलं राज्य वाचवाचयं, पुन्हा भाजपचं सरकार आणायचंय, राज्य उद्धवस्त करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचायचंय”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

महाराष्ठ्र उद्वस्त करायला निघालेल्या सांगू इच्छितो, तुमचा काळ संपला

नारायण राणेंनी मुंबईत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधून त्यांच्यावर टीका केली आहे. “महाराष्ठ्र उद्वस्त करायला निघालेल्या सांगू इच्छितो, तुमचा काळ संपला आहे. राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे:, असा दावा करत यावेळी राणेंनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बळ आणलं. आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी जोमाने काम करावं लागेल, कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.

“महाराष्ट्रातील सरकाराने गेल्या अडीज वर्षात कोणताही विकास केलेला नाही. उद्धव ठाकरे हे राज्याला उद्वस्त करत आहेत. आता हे सरकार हटविण्याची वेळ आली आहे. या सरकारचा काळ आता संपला आहे, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येणार”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत

राज्यसरकारच्या कामावरून नारायण राणे त्यांना नेहमीच सुनावत असतात. यावेळेस त्यांनी राज्यसरकारचे वाभाडे काढणार असल्याचं बोले आहेत. “महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत. 16 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात जाणार आहे. त्यांचं जे काही काम चालू आहे, राज्य ज्या पद्धतीने अधोगतीकडे नेहण्याचं काम करत आहेत. त्यावर बोलण्याचा प्रयत्न करेन. राज्यातील लोकांना जागृत करेन. त्यातच केंद्रामध्ये महाराष्ट्राला दिलेल्या न्यायाबद्दलही माहिती देईन”, असं यावेळी राणे म्हणाले आहेत.

तसेच राज्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. चिपळूणसह कोकणमध्ये पुन्हा एकदा पाहणीसाठी जाणार आहे. मी कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर आमच्या मंत्र्यांनी 700 कोटी रुपयांची मदत केली. अन् मुख्यमंत्री गेल्यानंतर फक्त दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. लोकांनी ते पैसे पिंपात टाकले, उद्धव ठाकरे यांच्या नावाने ते फुगून बाहेर येतील, अशी खिल्ली राणे यांनी ठाकरे सरकारची उडवली आहे.

महाराष्ट्राचं नाव देशात केल्याशिवाय राहणार नाही

नारायण राणे यांनी या वेळी बोलताना मोठ्या घोष्णाभाजी केल्या आहेत. ““मी काम करु शकतो हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला. मला मिळालेलं पद हे जनतेचं पद आहे. केंद्रात मंत्री झाल्यानंतर वेगळा अनुभव घेता आला. महाराष्ट्राचं नाव देशात केल्याशिवाय राहणार नाही”, असंही राणे म्हणाले.

शुभेच्छा बॅनर हटवले

नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज(१९ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. मात्र त्यांच्या एन्ट्री आधीच त्यांचे पोस्टर्स काढण्यात आले आहेत. शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन करतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षारोपण देखील करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे. मात्र या यात्रेवर पावसाचं सावट आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच मुंबई मनपाने माहिम , शिवाजी पार्क भागात नारायण राणे यांचे शुभेच्छा बॅनर हटवले. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करत, या भागातील बॅनर हटवले आहेत.

राणे जिथे शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे शिवसेनेचाच विजय

“राणे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे तिथे शिवसेनेचाच विजय होतो हा इतिहास आहे. राणेंचं पानिपत करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. राणे समोर असल्यावर ही ताकद आणखीनच वाढते. त्यामुळे भाजपने राणेंवर मुंबईच काय ठाणे महापालिका आणि इतर महापालिकेची जबाबदारी दिली तरी सर्वत्र शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही”, असं ते म्हणाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आनंद महिंद्रांनी मागितली कर्मचाऱ्याची माफी

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त दुकानदारांना दिला दिलासा, म्हणाले…

News Desk

कोर्टाच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही – संजय राऊत

News Desk