HW News Marathi
महाराष्ट्र

“शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रीपद?”, फडणवीस म्हणाले…

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल (७ जुलै) पार पडला. सर्वाधिक चर्चा रंगली ती शपथविधीमध्ये सगळ्यात पहिली शपथ घेणाऱ्या नारायण राणेंची. बाहेरून पक्षात आलेल्या आणि मंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्यांमध्ये देखील नारायण राणेंचा पहिला क्रमांकच लागला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपानं नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिलं असून त्यांना अधिक ताकद दिल्याचं बोललं जात आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका आणि त्यानंतर दोन वर्षात येणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून राणेंना शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात नेहमीच वाद होत असतात. नुकतंच भाजपच्या १२ आमदारांना विधिमंडळाच्या अधिवेशनातून वर्षभरासाठी निलंबित केलं म्हणून वाद सुरु होते. मात्र नवं वादाचं ठरलं आहे ते म्हणजे संजय राऊतांची नारायण राणेंवर केलेल्या टीकेमुळे. “चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात (गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या). वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर चर्चा होत असतात. राणेंना मंत्री बनवताना त्यांच्या क्षमतेचा विचार केला गेला असून बाकी कोणताही विचार केलेला नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?

“नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच नारायण राणेंसमोर महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचं तसंच करोना काळात कोलमडलेल्या उद्योगांना संजीवनी देण्याचं आव्हान असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारण आणि टीका करण्याची वेळ नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

News Desk

केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही, राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये –  मुख्यमंत्री

News Desk

“संन्यास घेतील फडणवीसांचे दुष्मन!”, शिवसेनेचा जोरदार वार

News Desk