HW News Marathi
महाराष्ट्र

”कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई”, किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या!

मुंबई। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्यातच कंगना रणौत च्या निशाण्यावर सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतात. म्हणूनच कंगना आणि शिवसेना यांचं आधीपासून वाकडं आहे. अशातच आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाच्या वक्तव्यावर आता चांगलीच टोकाची टीका केली आहे. भयानक कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई आहे, अशा कठोर शब्दात किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला टोला लगावला आहे. महापौर एवढं बोलून थांबल्या नाहीत तर सकाळी सकाळी बाईचं नाव घेऊ नये, असंही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आहेत.

आज बाळासाहेब ठाकरे यांचा 9वा स्मृतीदिन आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. आणि यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कंगना रणौतनं केलेल्या वक्तव्यावर भाष्य करत खरमरीत अशी टीका केली आहे.

पुन्हा एकदा कंगना बरळली

वादाचा धुमाकूळ कायम ठेवत अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा मंगळवारी दावा केला आहे, की सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधींकडून पाठिंबा मिळाला नाही. शिवाय कंगनाने गांधीजींच्या अहिंसेच्या मंत्राची खिल्ली उडवत, दुसरा गाल अर्पण केल्याने (थापड खाल्याने) स्वातंत्र्य “भीक” मिळत नाही, असे कंगनाने म्हटले आहे.रणौतने मागच्या आठवड्यात म्हटले होते की, भारताला १९४७ मध्ये भीक मिळाली होती स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यावर मिळालं. तोवरच पुन्हा एकदा कंगना बरळली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनाचा सामना धीराने व योग्य नियोजन करून केला पाहिजे !

News Desk

नागपूरातील गुणवंत पदकांना मुकणार

News Desk

“ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात?”, देवेंद्र फडणवीसांचं संतापजनक प्रश्न

News Desk