HW News Marathi
महाराष्ट्र

‘दुसरा गाल पुढे केल्यानं भिक मिळते स्वातंत्र्य नाही’; कंगनाच पुन्हा वादग्रस्त विधान!

मुंबई। वादाचा धुमाकूळ कायम ठेवत अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा मंगळवारी दावा केला आहे, की सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधींकडून पाठिंबा मिळाला नाही. शिवाय कंगनाने गांधीजींच्या अहिंसेच्या मंत्राची खिल्ली उडवत, दुसरा गाल अर्पण केल्याने (थापड खाल्याने) स्वातंत्र्य “भीक” मिळत नाही, असे कंगनाने म्हटले आहे.रणौतने मागच्या आठवड्यात म्हटले होते की, भारताला १९४७ मध्ये भीक मिळाली होती स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यावर मिळालं. तोवरच पुन्हा एकदा कंगना बरळली आहे.

कंगना आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हणाली?

इंस्टाग्रामवर कंगनाने एका आर्टिकलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहीले, ‘तुम्ही एकतर गांधीजींचे फॅन होऊ शकता किंवा नेताजींचे समर्थक. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय स्वत: घ्या.’ कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये लिहीले, ‘जे स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्यांना त्यांनी आपल्या मालकांकडे सोपवले. ते सत्तेचे भुकेले आणि धूर्त होते त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. हे तेच लोक होते ज्यांनी आपल्याला शिकवले की जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्यांच्यासमोर ठेवा, असं केल्याने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशाने स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मागते, विचार करून तुमचे हिरो निवडा.’ पुढे कंगना म्हणाली, ‘गांधीजींनी भगत सिंग, सुभाष चंद्र बोस यांचे कधीच समर्थन केले नाही. काही पुरावे आहेत, ज्यावरून वाटते की गांधीजींची इच्छा होती की, भगत सिंग यांना फाशी मिळावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक

News Desk

मी नार्को टेस्ट करायला तयार आहे मात्र तुमच्या सरकारचे नेते टेस्ट करतील ?

News Desk

‘विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरु करा’, आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk