HW News Marathi
महाराष्ट्र

“ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात?”, देवेंद्र फडणवीसांचं संतापजनक प्रश्न

मुंबई। मुंबईत साकीनाका प्रकरणात पीडितेच्या मृत्र्यू झाला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अनेक राजकारणी संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. “साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि त्यानंतर पीडितेचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात बलात्काराच्या घटना होत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, या घटना मुंबईत असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

“साकीनाका, अमरावती, पुण्यातील ३ घटना, पालघर, नागपूर या सगळ्या भयानक अशा घटना आहेत. मुंबईचा लौकिक सुरक्षित शहर म्हणून आपण पाहतो आहे. मुंबईत रात्री महिलांना फिरण्यात कधी अडचण येत नाही. पण अशा घटनांमुळे मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहोचतो आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आणि ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात असा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटना आहेत”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

बलात्कार प्रकरण- फास्ट ट्रॅक कोर्टात

साकीनाका बलात्कार प्रकरणात पीडितेला योग्य वेळी न्याय मिळावा या साठी ही केस फास्ट ट्रक कोर्टवर चालवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे होत होती. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी पोलिस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीचा फोन आला असून खैरानी रोडवर एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याची माहिती दिली. पोलिस तिथे पोहोचली आणि रक्ताच्या थारोळ्यात ती महिला जखमी आढळली. तिला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती करण्यात आली, पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवलेला आढळून आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वसतिगृह, सांस्कृतिक भवनाची कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास कारवाई! – मंत्री धनंजय मुंडे

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त दुकानदारांना दिला दिलासा, म्हणाले…

News Desk

जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या प्रतिमेला शेण, चपलांचा मारा करत राजीनाम्याची मागणी

News Desk