HW News Marathi
महाराष्ट्र

एस टी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावरून पंकजा मुंडेंची खंत!

बीड। एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने सहानुभूतीने चर्चा करून घेणे गरचेचे असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांनी सरकारच्या धोरणाबाबत खंत व्यक्त केली, तर माझ्या काळात अनेक आंदोलन उभारली गेली मात्र आम्ही त्यांना सामोरे गेलो त्यांच्या सोबत चर्चा केल्या आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सरकार आंदोलन कर्त्याकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नसल्याची खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

सध्याचे राजकारण हे विनोदाचे राजकारण

पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारण हे समाजभिमुख असायला पाहिजेत या राजवट दिग्गज असे राज्यकर्ते पाहिलेत सत्ताधाऱ्यांनी विकासाभिमुख भूमिका घेतली पाहिजे तर विपक्षाने सत्तादारी काही करत नसेल त्यांच्यावर आवाज उचलला पाहिजे मात्र सध्याचे राजकारण हे विनोदाचे राजकारण सुरू असून मी याबद्धल काय बोलावे असा प्रश्न देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

राजकारणाचा दर्जा प्रचंड खालावला

पुढे बोलताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या की, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली ते माहित नाही, मात्र राजकारणाचा दर्जा प्रचंड खालावला आहे. सत्तेत बसलेले पक्ष आमच्यावर आरोप करत आहेत. या सर्व गोंधळामध्ये राज्याचा विकास मागे पडला असून, नको ते विषय समोर येत आहेत. विरोधी पक्षांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा जर विकासावर भर दिला तर अधिक चांगले होईल, मात्र आता अलीकडच्या काळात राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते असे देखील मिश्किलपणे पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केले. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी प्रतिपादन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आत्मविश्वास

Aprna

…अन् फडणवीस म्हणाले आम्ही वेटिंगवर राहात नाही!

News Desk

सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारकी मिळवणारे मातब्बर नेते भारत भालके!

News Desk