HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय – चित्रा वाघ

मुंबई। महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे गेल्या काही दिवसांपासून ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला आहे.आणि या कारवायांवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता भाजपवर टीका केलीय. ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणा आमच्याविरोधात वापरता ना. मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. त्यांना पाहून अतिरेकी पळून जातील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय. राऊतांच्या या वक्तव्याचा आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ईडीची एवढी भीती वाटतेय. सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय, अस उत्तर चित्रा वाघ यांनी दिल आहे.

केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय. हे ‘अलीबाबा अन् 40 चोरांचं’सरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल’, असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टोला लगावला.

संजय राऊत काय म्हणाले होते?

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांवर, मंत्र्यांवर भाजपचे नेते भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना नुसत्या खुर्च्या उबवू नका, तर भाजपला सडेतोड उत्तर द्या, असं आवाहन केलं आहे. तसंच, किरीट सोमय्या यांना काश्मीरमध्ये पाठवा, असं देखील राऊत म्हणाले.संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांना आवाहन केलं. महाविकास आघाडीतल्या सगळ्याच मंत्र्यांना आवाहन आहे, की नुसतेच खुर्च्यांवर बसु नका. प्रति हल्ले करा, टोल्याला टोला , हे आठ दिवसात पळून जातील, असं राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ED ने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

Aprna

पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास सुरुवात

News Desk

राज्यपालांनी ‘या’ करणासाठी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

News Desk