HW News Marathi
महाराष्ट्र

देशातील नंबर एक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख तर राणेंचा उल्लेखच नाही!

सिंधुदुर्ग। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विमानतळाच्या उद्घाटन करून राजकारण झालेलं पाहायला मिळालं अखेर त्याच चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा आज पार पडला. चिपी विमानतळाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित झाले होते. यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी देसाईंनी नारायण राणेंचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

आता कोकणवासियांची सर्व स्वप्न साकार होतील

अनेकांनी या विमानतळाच्या उद्घाटनाला उशीर झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, पायगुण लागतो म्हणतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन होत आहे, असंही देसाई म्हणाले. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विमानतळासाठी लागण्याचा प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा ते करत राहिल्याचं देसाईंनी सांगितलं. चिपी विमानतळाचा द्रोणागिरी उचलण्यासाठी अनेकांचा हातभार लाभला. त्यात मी ही एक बोट लावलं. कोकणाच्या, आपल्या दृष्टीनं हा आनंदाचा सण आपण साजरा करत आहोत. आता कोकणवासियांची सर्व स्वप्न साकार होतील, असंही देसाई यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं

विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते. यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार घातला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. एकंदरितच तेरी भी चुप-मेरी भी चुप असा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला.

आदित्य ठाकरेंकडून राणेंचा उल्लेख

सुभाष देसाई यांच्यानंतर बोलण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उभे राहिले. त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांचं नाव घेतलं. तसंच पर्यटनाच्या दृष्टीने कोकणाच्या विकासात हे चिपी विमानतळ एक मैलाचा दगड ठरेल असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आर्यन खानला मिळणार का जामीन? आज जामीन अर्जावर हायकोर्टात होणार सुनावणी

News Desk

आत्तापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो पण आता गडबड वाटतेय!

News Desk

शरद पवारांच्या हस्ते होणार तावडे अतिथी भवना” चे उदघाटन

News Desk