HW News Marathi
महाराष्ट्र

“उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेसची लोकं जीवंत झाली”

मुंबई | जिल्हा परिषदच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसता आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी करण्याच्या सुचना कार्यकर्त्यांना देताना दिसता आहेत. नागपूरमधील शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल यांनी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बोलत असताना, ‘काँग्रेसचे लोकं मेले होते, त्यांना कोणी विचारत नव्हतं, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना सरकारमध्ये घेतलं आणि ते जिवंत झाले’ असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यातच तिन्ही पक्षांचे वेगवेळे नेते वारंवार एकमेकांवर आरोप करताना दिसता आहेत

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की नाही, यावर चर्चा सुरु आहेत. त्यातच तिन्ही पक्षांचे वेगवेळे नेते वारंवार एकमेकांवर आरोप करताना दिसता आहेत. या वादात आता शिवसेना आमदार आशीष जयस्वाल यांनी आणखीच भर घातल्याचे पाहायला मिळते आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये समावेश करुन घेतला म्हणून काँग्रेसचे लोक जिवंत झाले, असे म्हणत आशीष जयस्वाल यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले – सत्यजीत तांबे

News Desk

शिवसेना मंत्री-नेत्यांची तातडीची बैठक, उद्धव ठाकरे राठोडांबाबत कठोर निर्णय घेणार ?

News Desk

अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला, शालिनीताई पाटलांचा आरोप

News Desk