HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारची घोषणा!; ST कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्क्याने वाढ

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळे वेतना वाढ करण्यात आल्याची माहिती परबांनी दिली आहे. अखेर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपवार तोडगा काढला आहे. “उच्च न्यायालयाने विलीनीकरणाबाबत समिती स्थापन केली आहे. या समितीची जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू अशी आमची भूमिका पूर्वीच जाहीर केली होती,” असे परबांनी स्पष्ट केले आहे. परबांनी आज (२४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदे एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले..

गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटी कर्मचारी १५ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत वेतन वाढीवर सकारात्मक चर्चा झाली. यानंतर परबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या निर्णयावर चर्चा केली.

 

अनिल परबांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

 

  • एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर शासन सर्वोतपरी प्रयत्न करणार
  • मुंबईत आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परवा कामावर हजर होण्याची मुभा
  • राज्य सरकारला ६० कोटीचे अतिरिक्त भार येणार असल्याचे परबांनी स्पष्ट केले आहे
  • ज्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्त आणि निलंबनाची कारवाई मागे घेणार आहे. त्यांनी देखील उद्यापासून कामावर हजर रहावे, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले
  • राज्य सरकार जसे दोन पावले पुढे आले, तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी देखील दोन पावले पुढे यावे, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केली आहे.
  • एसटी कर्मचाऱ्यांची ही पगारवाढ नोव्हेंबर महिन्यापासूनच मिळणार
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मार्गदर्शन केले
  • शिस्त राहवी म्हणून अटी असतील, पण कोणावर अन्या होणार नाही, यांची काळजी घेणार
  • एसटी कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेच्या आत होणार, असे आवश्वासन राज्य सरकारने दिले आहे
  • १० ते २० वर्ष श्रेणीतील अनुभव असेलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४ हजारात वाढ, ४० हजारांवरील असणाऱ्यांच्या अडीज हजारांनी वाढ
  • १ ते १० वर्ष श्रेणीतील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना ५ हजारांनी वाढ
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्क्यांनी वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे
  • सरकारी कर्मचाऱ्यांना जो डीए दिला जातो तोच एसटीच्या कर्मचाऱ्यांना डीए दिला जातो
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळे वेतना हजारांनी वाढ झाली आहे
  • विलीनीकरण होईल पर्यंत पगारवाढीचा निर्णय सरकारने घेतला आहे
  • समितीचा निर्णय येईपर्यंत कायम राहिली. म्हणून सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे
  • समितीचा जो निर्णय येईल, तो निर्णय राज्य सरकार मान्य करेल
  • सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, उदय सामंत, यांनी एसटी कर्मचाऱ्यासदर्भात काम केले आहे
  • एसटी संप दिवसेंदिवस लांबला होता. संपामुळे ग्रामीण भागातील शाळा, कॉलेज आणि लोकांना त्रास होत होता.
  • विलीनीकरणचा निर्णय न्यायालयाने १२ समिती नेमली आहे, समितीचा अहवाल १२ आठवड्यात मुख्यमंत्र्यांकडे द्यावे. मग न्यायालय हा निर्णय घेते, ही समिती जो निर्णय घेत, तो आम्ही मान्य करू अशी भूमिका नेहमी मांडली आहे
  • १५ दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता, एसटीचा राज्य शासनात विलीनीकरण करावे ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

11 वीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, पण कशी? जाणून घ्या…

News Desk

कृषी विधेयकाबाबत काढलेल्या अधिसुचनेला राज्यात स्थगिती!

News Desk

विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही | मुख्यमंत्री

News Desk