HW News Marathi
महाराष्ट्र

हसन मुश्रीफांच्या विरोधात किरीट सोमय्यांकडून ईडीकडे अजून कागदपत्र सुपूर्द!

मुंबई। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण, सोमय्यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्याबाबत ईडीकडे दिल्यानंतर आज त्यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र दिली आहे. या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि परिवाराने बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. तसंच हसन मुश्रिफ यांना एक इशारा द्यायलाही सोमय्या विसरले नाहीत.

100 कोटी रुपये कशाप्रकारे आले?

ज्या बेनामी कंपन्यांकडून त्यांनी किती पैसे घेतले. ते कुठे ट्रान्सफर केले, त्याचा किरीय सोमय्याचा ऑडिट रिपोर्ट आज ईडीला दिला. काही दिवसांपूर्वी सर सेनापती कागलमधील कारखान्याची माहिती दिली होती. आज आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याबाबत माहिती दिली आहे. या कारखान्यात 100 कोटी रुपये कशाप्रकारे आले? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी केलाय. ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत त्याच्या नावानं बँकेत खाते उडलं आणि त्यातून कारखान्यात पैसे आले. आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडियाला चालवायला दिला. राज्य सरकारकडूनही ब्रिक्स इंडियाला मदत करण्याचे आदेश देण्यात आले, या सगळ्या प्रकाराचा सातबारा आपण ईडीला दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

सीएसएमटीवर खोटी नोटीस दाखवली

दरम्यान, सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्याबाबत विचारलं असता हसन मुश्रीफांवर क्रिमिनल कारवाई करायची असेल तर मला कागलमध्ये तक्रार द्यावी लागेल. एक एफआयआर झाला की अन्य तपास यंत्रणांना मदत होते. पण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शलरद पवार यांच्या मार्गदर्शनाथाली मला सात तास घरी कोंडून ठेवलं. सीएसएमटीवर खोटी नोटीस दाखवली. त्यामुळे एफआयआर जरी काही दिवस थांबला असला तरी किरीट सोमय्या थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

त्याविरोधात मी आठवड्याभरात कोर्टात जाणार

ब्रिक्स इंडिया ही हसन मुश्रीफ परिवाराची बेनामी कंपनी आहे. हजार कोटी नाहीतर एक लाख कोटीचा दावा दाखल करा. पण मी सांगतो की हसन मुश्रीफ आणि परिवार यांनी घोटाळ्याचा पैसा बेनामी कंपन्या, शेल कंपनीकडून या दोन कारखान्यात गुंतवणूक केली. त्याबाबत तपास सुरु आहे. या तपासाला गती मिळावी यासाठी ईडीला कागदपत्र दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.त्याचबरोबर दिलीप वळसे-पाटील, उद्धव ठाकरे यांनी मला बेकायदेशीरपणे रोखलं, बोगस ऑर्डर दाखवली. त्याविरोधात मी आठवड्याभरात कोर्टात दाणार आणि मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही यावेळी सोमय्या यांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकार शेतकरी विधेयक आणि सुधारणा विधेयक राज्यात लागू करणार नाही – अजित पवार

News Desk

राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार !

News Desk

भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रानअली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

News Desk