HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंना मोठा दणका, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील

औरंगाबाद | भाजप नेत्या पंकजा मुंडेंना मोठा झटका बसला आहे. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. पीएफची रक्कम थकल्यामुळे ईपीएफओच्यावतीने वैद्यनाथ कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. पीएफचे एक कोटी 46 लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी (ता. पर‌ळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले. तब्बल 92 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळातील कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण 1.46 कोटींची रक्कम थकीत होती. उर्वरित 56 लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले आहे. सर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.

वैद्यनाथ साखर कारखान्यात झाली होती चोरी

याआधी, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात डिसेंबर महिन्यात चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी कारखान्याच्या स्टोअर गोडाऊन आणि वर्कशॉपमधून तब्बल 37 लाख 84 हजारांचं साहित्य लंपास केल्याची तक्रार परळी ग्रामीण पोलिसांत 22 डिसेंबर रोजी देण्यात आली होती. त्यानंतर परळी पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला. या चोरी प्रकरणात अखेर परळी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेत कारवाई केली होती.

कामगारांनी उगारले संपाचे हत्यार

दरम्यान, 19 महिने 700 कामगारांना पगारच मिळाला नसल्याने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी मार्च महिन्यात कारखाना बंद केला होता. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरु करणार नसल्याची भूमिका घेत हे कामगार संपावर गेले होते. एकेकाळी वैद्यनाथ कारखाना आशिया खंडात नावाजला गेला. परंतु, मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आलेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सब का विश्वास’ हे मोदींचे ढोंग आहे का? काँग्रेसचा भाजपा नेत्यांना सवाल

News Desk

ठाण्यात कारमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या

News Desk

काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक सुरू, सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा होणार

News Desk