HW News Marathi
Covid-19

“मोदींना ना कोरोना आवरता येतोय ना सत्ता”, काँग्रेसची टीका

नवी दिल्ली। उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची सध्या तयारी सुरुये आणि चर्चेचा विषय देखील आहे. या निवडणुकीच्या चर्चासत्रात बोलताना काँग्रेस प्रवक्त्या रागिणी नायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागलीये, मोदींना ना कोरोना आवरता येतोय ना सत्ता. असं वाटतंय की आता झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात रागिनी नायक यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी दोघेही एकमेकांवर वरचढ होण्यासाठी पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं एकमेकांशी पटत नाही. भाजपशासित राज्यांमध्ये नुसता गोंधळ माजला असल्याचं रागिनी नायक यांनी म्हटलं आहे.

कोरोना असो नाहीतर सत्ता दोन्हीही मोदीजींच्या हाताबाहेर जाऊ लागलेत. आता असं वाटतंय की बहुतेक झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आलेली आहे, असं रागिनी नायक यांनी यासंदर्भात ट्विट करत सांगितले.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. कोरोनामुळे झालेल्या स्थितीवरूनही विरोधकांनी निशाणा साधला आहे. रागिनी नायक यांच्या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

News Desk

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये लॉकडाऊन लागू शकतो !, आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

News Desk

आज रात्री ८ वाजता पंतप्रधान देशातील जनतेला संबोधित करणार

News Desk