HW News Marathi
Covid-19

१८ वर्षांखालील मुलांचं लसीकरण लवकरच सुरू होणार, केंद्राने दिली माहिती

मुंबई | कोरोना महामारीशी लढण्यासाठी त्यावरची लस हा एकमेव उपाय आहे. देशात लसीकरणाची मोहीम जानेवारी पासून सुरुवात झाली असून सगळ्यात आधी कोरोना योद्धांना आणि मग सासर्वसामान्यांसाठी लस उपलबध करण्यात आली. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण तर वेगात सुरू आहेच. मात्र आता १८ वर्षांखालील मुलांचं लसीकरणही लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सध्या देशात १८ वर्षांखालील मुलांवर लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत आणि त्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

१८ वर्षांखालील मुलांवर लसीच्या चाचण्या सुरू

देशात लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून अनेकांना १८ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाबाबत शंका होती. केंद्र सरकारने आज (१६ जुलै) दिल्ली उच्च न्यायालयाला याबद्दलची माहिती दिली. १८ वर्षांखालील मुलांवर सध्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, त्या लवकरच पूर्ण होतील. त्या पूर्ण झाल्या आणि तज्ज्ञांनी लसीकरणाची मान्यता दिली की लगेचच १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठीचं नियोजन करण्यात येईल आणि या लसीकरण मोहिमेलाही लगेचच सुरुवात करण्यात येईल असं केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितलं.

लसीच्या चाचणी प्रक्रियेला वेळेची मर्यादा घालून द्यावी या मागणीला न्यायालयाने धुडकावून लावलं आहे. संशोधनाला वेळेची मर्यादा घालून चालणार नाही, असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिलं. प्रत्येकजण लस मिळवण्याच्या घाईत आहेत. मात्र, जर योग्य चाचण्या झाल्या नाहीत तर मोठं संकट निर्माण होईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्रयांची मोदींना विनंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१६ जुलै) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कॉन्फेरेंस कॉल वरून संवाद साधला. या संवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींना एक विनंती केली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी, केंद्र सरकारनेच आता त्यांच्या स्तरावरून देशपातळीवर व्यापक धोरण आणावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

महाराष्ट्र मध्ये चिंताजनक परिस्थिती

महाराष्ट्र सह देशावर गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच संकट घोंगावत आहे. सर्वच राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यापैकी काही राज्यांमध्ये ही परिस्थिती चिंताजनक आहे. तर काही राज्यांमध्ये परिस्थिती निवरली आहे, तर याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली असून राज्यांना कोरोनाशी लढण्याच सूत्र देखिल सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, कोरोनापासून वाचायचे असल्यास मास्क बंधनकारक

News Desk

सचिन पायलट अगदी बिनकामाचा माणूस, मी त्यांचा कट आधीच ओळखला होता !

News Desk

ठरलं ! उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेचे ९ आमदार ‘या’ दिवशी घेणार आमदारकीची शपथ

News Desk