HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नव्हे मराठा समाजच अशोक चव्हाणांचा राजीनामा मागेल !

मुंबई । “मी व्यक्तिश: किंवा भाजप अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. मराठा समाजच ही मागणी करेल”, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मंत्री आणि मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने झाली आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘अशोक चव्हाण आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत’, अशी भावना जर मराठा समाजात निर्माण झाली असेल तर समाजच अशोक चव्हाणांचा राजीनामा मागेल.”

“अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील सगळे कामकाज नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे. मी व्यक्तिशः व आमचा पक्ष कोणाचाही राजीनामा मागणार नाही. पण जर मराठा समाजात अशी भावना रुजली असेल की, ‘अशोक चव्हाण मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत’ तर मराठा समाजच त्यांचा राजीनामा मागेल”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. याचसोबत यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ‘सारथी’बाबत देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला आहे.

“सारथीला दिलेल्या १ एकर जागेत भवन उभे करण्यासाठी पुढची ५ लागतील. अजितदादा, या ५ वर्षांमध्ये भाडे तत्त्वावर एखाद्या जागेत का होईना पण ‘सारथी’चे कामकाज चालवणार आहात की नाही?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे !

News Desk

‘धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे’, राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट!

News Desk

“ST कर्मचाऱ्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून आपलं नुकसान करून घेऊ नये!” परबांची विनंती

News Desk