HW News Marathi
Covid-19

कहर ! राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांची नोंद ५० हजारांच्या जवळपास

मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. राज्यातील आकडा दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (३ एप्रिल) एकाच दिवसात राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील आजची ही कोरोनाबाधितांची नोंद म्हणजे राज्य सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कठोरात कठोर नियम लागू होण्याची शक्यता आहे.

जारी झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आज नवीन 37 हजार 821 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात सद्यस्थितीत एकूण 4 लाख 01 हजार 172 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे. राज्यातील हा कोरोनाचा कहर पाहता राज्य सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेणार की कडक निर्बंध लावणार ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत सल्ला देण्याचा अधिकारच नाही !

News Desk

पुण्यात चौथ्या टप्यात १५ लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचं टार्गेट – मुरलीधर मोहोळ

News Desk

…तर मुंबईत लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल! – अस्लम शेख

Aprna