HW News Marathi
महाराष्ट्र

“राऊतांनी उगाच मिठाचा खडा टाकू नये”, गृहमंत्र्याबद्दलच्या वक्तव्यावर अजित पवारांनी फटकारले

मुंबई | राज्यात सध्या अनेक विषयांमुळे सरकारवर आणि विशेष करुन गृहखात्यावर संकट आले आहे. आत्तापर्यंतची या सगळ्या संकटांवर भाजप जेव्हा मबाविकासआघाडी सरकारला टोला लगावत होते तेव्हा त्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांच्या साहाय्याने किंवा सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देत होतेच. मात्र, आज (२८ मार्च) सामनामधील रोखतो या सदरात राऊतांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच निशाणा साधला आहे. देशमुखांकडे गृहमंत्री पद अपघाताने आलं असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेवर स्वत: अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांनी जे आरोप केले त्याची चौकशी करावी अशी मागणी मंत्रीमंडळात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी ती मान्य केली. आणि त्यानंतर या आरोपांचा चौकशी रिटायर्ड हायकोर्टाचे जज यांच्याकडून होणार आहे, असं देशमुख यांनी म्हटलं. पण त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर कोणतेही उत्तर देण्याचं टाळले आहे.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे सरकार महाविकास आघाडी म्हणून काम करते आहे. या सरकारमध्ये कोणाला मंत्री करायचे, हा त्या त्या पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकार व्यवस्थित चालू असताना इतरांनी, विशेषतः या तीन पक्षांमध्ये असलेल्या कुणीही त्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये, असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत. ते पक्षातील कोणत्या नेत्याला मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या पक्षातील कोणत्या नेत्यास मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तोच प्रकार काँग्रेसमध्ये देखील आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणाला मंत्री करायचे हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे. यापूर्वी देखील काँग्रेसमध्ये असताना पवार साहेबांनी सुधाकरराव नाईक असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या देताना भूमिका पार पाडली होती. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालू असताना कुणी यामध्ये मिठाचा खडा टाकू नये असे पवार म्हणाले.

नवाब मलिक काय म्हणाले?

“सामना वर्तमान पत्राला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. सामना हा सेनेशी सलग्न असलेले वर्तमानपत्र आहे. त्यामुळे हा वाद निर्माण करणं योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चा करुन सर्वांना जबाबदारी दिली आहे. त्यामुळे असा प्रकार झाला असे वाटत नाही,” असे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

“लोकशाहीत एखाद्या वर्तमानपत्राला विश्लेषण करणे, मत मांडणे हे त्यांचे अधिकार आहे. सामना हे शिवसेनेशी संलग्न आहे. त्यामुळे जे वर्तमानपत्र अधिकार आहे. त्या अधिकाराखाली त्यांनी म्हटले आहे. त्याबद्दल किती सत्यता आहे. हे मला माहिती नाही. पण पवारांनी चर्चा करुन ही जबाबदारी नीट वाटून दिली आहे,” असेही नवाब मलिक म्हणाले.

अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद अपघाताने – सामना (रोखठोक सदर)

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो.

अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये भाजपला धक्का, २ नेते हाती बांधणार शिवबंधन

News Desk

शेतकऱ्याची अजब मागणी! २ एकरात गांजा लावण्याची परवानगी द्या… अन्यथा….

News Desk

दानवे विरोधात शिवसैनिकांनी केले ” जोडे मारो आंदोलन “

News Desk