HW News Marathi
Covid-19

मोदी सरकारची ७ वर्षे अन् सर्वसामान्यांचे हाल !

मुंबई । “मोदी सरकारच्या ७ वर्षात नोटाबंदी झाली, जीएसटी लावण्यात आला, कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही, लोकांचे हाल झाले, बेरोजगारी वाढली, नोकर्‍या गेल्या, लोकं जीव गमावत आहेत…तरीही भाजप सरकारची ७ वर्ष साजरी करणार होती”, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान म्हणूनच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना उत्सव साजरा करु नका असा आदेश काढावा लागला असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

“२६ मे रोजी केंद्रातील भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “या देशात भाजपचे सरकार आहे मात्र ते मोदी सरकार म्हणून ओळखले जाते आहे. या सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे लोक उत्सव साजरा करणार होते. म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी उत्सव साजरा करु नका असा आदेश काढला आहे ही सत्य परिस्थिती आहे”, असेही नवाब मलिक म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोना रूग्ण संख्या घटली!

News Desk

“आरोग्य क्षेत्राचे बजेट दुप्पट करण्यात आले “, मोदींनी साधला डॉक्टरांशी संवाद 

News Desk

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधितांचा तर ४८ जणांचा मृत्यू

News Desk