HW News Marathi
देश / विदेश

भाजपच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांच्या पत्राची दखल!

दिल्ली | देशामध्ये रासायनिक खतांच्या किमती वाढवण्यात आल्याने मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.खतांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.यासंदर्भात महाराष्ट्राकतील अनेक नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहीली होती.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा पत्र लिहीले होते. पवारांना केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले.

कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने देशभरातील शेतकरी अडचणीत सापडला. रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवारांनी पत्राद्वारे केली होती. केंद्रीय खत व रसायन मंत्री श्री. डी. व्ही. सदानंद गौडा यांना या प्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालण्याची आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घेण्याची विनंती पवारांनी मंगळवारी एका पत्राद्वारे मंत्री महोदयांना केली. या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी आज पवारांशी फोनवर चर्चा केली. पत्रातील सूचनांचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे त्यांनी पवारांना आश्वासित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चुकीची माहिती दिल्याने मुख्यमंत्र्यांसह सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी ?

News Desk

फडणवीसांनी महाविकासआघाडीला दिले १०० पैकी १५ गुण !मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली ..

Arati More

कुत्र्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने दोघींची आत्महत्या

News Desk